शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

रूग्णालयातून पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:29 IST

दारूचे व्यसन सोडल्याने शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पिंपरीच्या यशवंतराव स्मृती रूग्णालयात (वायसीएम) दाखल केलेला रूग्ण तेथून पळून गेला होता. या बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आला.

ठळक मुद्देरुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नातेवाईकांचा गोंधळ

पिंपरी : मद्याचे व्यसन सोडल्याने शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पिंपरीच्या यशवंतराव स्मृती रूग्णालयात (वायसीएम) दाखल केलेला रूग्ण तेथून पळून गेला होता. या बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आला. मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच रुग्णालयात मृत व्यक्तीचे नातेवाईक जमा झाले. मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे रूग्णालयात तणावाचे वातावरण होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन देवराम सावंत (वय ४२, रा. भोसरी चक्रपाणी वसाहत)असे मृत रुग्णाचे नाव आहे. त्याला मंगळवारी (दि.८ मे )  रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या पाच सहा वर्षांपासून दारूचे व्यसन असलेल्या मोहन यांनी महिनाभरापासून दारू पिणे सोडले होते. कालांतराने त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना मंगळवारी ८ मे रोजी वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र,९ मे रोजी रात्री हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत गायब झाला. रूग्णालयातून रूग्ण गायब झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी रूग्णालयातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईक जवळच्या संत तुकारामनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेले. त्याचवेळी एका रूग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोलीस चौकीतून नातेवाईकांनी पुन्हा रूग्णालयाकडे धाव घेतली. रूग्णालय आवारात येवून पाहिले असता पळून गेलेल्या सावंत यांचा मृतदेहाची ओळख पटली.ओळख पटल्यावर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे रूग्णालयात तणावाचे वातावरण होते.सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, नातेवाईकांनी संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार रूग्णालयातून रूग्ण पळून जातो कसा? येथील सुरक्षा रक्षक करतात तरी काय? रूग्णालय परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे प्रकार का कैद होत नाहीत. रूग्णांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांना रूग्णालयात सोडण्यास मज्जाव करून कर्तव्यदक्ष असल्याचे भासविणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या समोर रूग्ण पळून जातात. हे लक्षात कसे येत नाही. अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करून मोहन सावंत यांच्या नातेवाईकांनी रूग्णालय व्यवस्थापनास धारेवर धरले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू