शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘त्या’च्या कृतज्ञतेच्या जाणिवेची ‘दशक्रिया’, बैलाच्या मृत्यूनंतर केले सर्व धार्मिक विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 20:44 IST

घाटावर बैलाच्या पिंडाला ‘काकस्पर्श’ झाला आणि सर्वांनी एकच हंबरडा फोडला... मालकाच्या या भावनिक गुंतावळीने ‘नाग्या’चा आत्माही गहिवरला असेल...

ठळक मुद्देहवेलीसह सहा तालुक्यांमधील बैलगाडा शर्यतींमध्ये ‘फायनल सम्राट’ ओळख

कोरेगाव भीमा :  ‘तो’ त्यांच्या शेतात राबायचा... औत ओढायचा... शेतशिवार हिरवंगार करण्यात आणि घरातील धान्याच्या कणग्या भरण्यात त्याच्या कष्टाचा मोठा वाटा... कुटुंबातील सदस्य असलेल्या  ‘त्या’चा मृत्यू झाला... दु:खात लोटलेल्या कुटुंबाने कृतज्ञतेच्या भावनेतून दशक्रिया विधी केला... माणसाच्या मृत्यूपश्चात केले जाणारे सर्व धार्मिक विधी केले... घाटावर पिंडाला ‘काकस्पर्श’ झाला आणि सर्वांनी एकच हंबरडा फोडला... मालकाच्या या भावनिक गुंतावळीने ‘नाग्या’चा आत्माही गहिवरला असेल...प्राणी आणि मानवामधील भावनिक बंधाच्या अनेक कथा आजवर समोर आल्या आहेत. कृषीप्रधान भारतीय संस्कृतीमध्ये बैलाला सन्मानाचे स्थान आहे. बैलपोळा साजरा करुन बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. ‘भूतदया’ हा अंगभूत सद्गुण असायला हवा असे संस्कार बालवयात केले जातात. मात्र, कृतीमधून फार थोडके लोकच प्राण्यांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात. शेतक-याच्या कुटुंबात मात्र, बैलांना कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक दिली जाते.       कोरेगाव भीमा येथील राजाराम काळुराम गव्हाणे, विश्वास काळूराम गव्हाणे या बंधूंनी त्यांच्या  ‘नाग्या’ बैलाबाबत असलेला भावनिक बंध आपल्या अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. या दोघांनाही बैलगाड्यांचा छंद आहे. बैलांचा मुलांप्रमाणे सांभाळ करण्याचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. या दोघांनी दहा वर्षांपुर्वी लोणीकंद येथील पांजरपोळ संस्थेमधून नाग्या बैल आणला. त्याला उत्तम प्रतीचा आहार दिला. तसेच घाटामध्ये पळण्यायोग्य तयार केले. नाग्याने शिरुर, हवेलीसह सहा तालुक्यांमधील बैलगाडा शर्यतींमध्ये लौकिक मिळवला. त्याची ओळख  ‘फायनल सम्राट’ अशीच झाली होती. त्याच्यावर हे दोघेही बंधू जिवापाड प्रेम करीत होते. त्याचा 5 एप्रिल रोजी मृत्यू झाला. गव्हाणे कुटुंबियांना याचे अतोनात दु:ख झाले. त्याच्यावर यथोचित अंत्यसंस्कार करण्यात आले. दहा दिवस दुखावटा पाळून त्याचा दशक्रिया विधी करण्यात आला. मृत्यूपश्चात केले जाणारे सर्व धार्मिक विधी करण्यात आले. गव्हाणे कुटुंबियांची ही प्राण्यांप्रती असलेली कणव पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.   केवळ दशक्रिया विधी करुनच हे कुटुंब थांबले नाही तर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवचनही ठेवण्यात आले होते. या दशक्रिया विधीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, नातलग, मित्रमंडळी, बैलगाडा मालक उपस्थित होते. यावेळी पेटा या संस्थेने बैलगाडा शर्यतीवर लावण्यात आलेली केस मागे घेऊन सरकारने देखील बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात अशी एकजुटीने करण्यात आली. गव्हाणे कुटुंबियांनी बैलाबाबत दाखविलेली संवेदनशीलता आणि प्रेम पाहून अनेकजण हेलावून गेले होते. 

 

टॅग्स :Puneपुणे