शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी नदी परिसरात डासांचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 01:19 IST

आळंदी येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आळंदी - येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तर, येथील रुग्णालयात डासांनी चावलेल्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. या मुळे इंद्रायणी नदीत कुजलेली जलपर्णी तत्काळ काढण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे. इंद्रायणी नदीचे चौंडी घाटालगत परिसरातील गवतांसह झाडे झुडपांच्या साम्राज्याने नागरिकांतून नाराजी वाढली आहे.चिखली, कुदळवाडी, कुरुळी, चिंबळी परिसरातील रसायन व मैलामिश्रित सांडपाणी अनेक ठिकाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात येत असल्याने आळंदी परिसरात नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तसेच उन्हाने वाळलेली जलपर्णी कुजून चालली आहे. या जलपर्णीवर वाहून आलेला कचरा या ठिकाणी साचतो, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. ही कुजलेली जलपर्णी इंद्रायणी नदीबाहेर काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत. जलपर्णी काढून नदीपात्र प्रदूषणविरहीत करण्याची मागणी केली.आळंदीत नदी परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. यात इंद्रायणीनगर, गोपाळपूर, इंद्रायणी नदीलगतच्या दुतर्फा नागरिकांसह भाविकांना या डासांच्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना डास चावल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. आळंदी नगर परिषद प्रशासनाने कुजलेली जलपर्णी तसेच नदीकिनाऱ्यालगत दुतर्फा वाढलेले गवत व झाडाझुडपांचे साम्राज्य हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीत कुजलेली व साचलेली जलपर्णी हटाव मोहीम राबविण्यासह जंतुनाशक फवारणी, नदीचे परिसरात धुरीकरण करण्याची मागणी ही नागरिकांनी केली आहे.डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीमडोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याची मोहीम राबविण्यात आली. या वेळी डेंग्यूच्या आजाराला कारणीभूत असलेल्या डासांच्या अळ्यांची ठिकाणे नष्ट करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस देवकाते, डॉ. बी. एन. दडस, आरोग्य सहायक व्ही. एन. घुले, एन. एस. ठोके, बी. डी. नातू, एन. एम. लकडे, आरोग्य सेवक एस. एस. गोरे, एस. एस. उपाध्ये, विजय जगताप, जे. एम. दळवी तसेच आशा कार्यकर्त्या या सर्व आरोग्य विभागाने गावात कंटेनर सर्व्हे, पाणी पुरवठा नियंत्रण, ओटी टेस्ट, ताप रुग्ण तपासणी केली. नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी पाणी साठवणारी भांडी घासून पुसून कोरडी व रिकामी करावीत, पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा, अशा सूचना गावकºयांना केल्या .

टॅग्स :indrayaniइंद्रायणीnewsबातम्या