शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

इंद्रायणी नदी परिसरात डासांचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 01:19 IST

आळंदी येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आळंदी - येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तर, येथील रुग्णालयात डासांनी चावलेल्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. या मुळे इंद्रायणी नदीत कुजलेली जलपर्णी तत्काळ काढण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे. इंद्रायणी नदीचे चौंडी घाटालगत परिसरातील गवतांसह झाडे झुडपांच्या साम्राज्याने नागरिकांतून नाराजी वाढली आहे.चिखली, कुदळवाडी, कुरुळी, चिंबळी परिसरातील रसायन व मैलामिश्रित सांडपाणी अनेक ठिकाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात येत असल्याने आळंदी परिसरात नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तसेच उन्हाने वाळलेली जलपर्णी कुजून चालली आहे. या जलपर्णीवर वाहून आलेला कचरा या ठिकाणी साचतो, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. ही कुजलेली जलपर्णी इंद्रायणी नदीबाहेर काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत. जलपर्णी काढून नदीपात्र प्रदूषणविरहीत करण्याची मागणी केली.आळंदीत नदी परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. यात इंद्रायणीनगर, गोपाळपूर, इंद्रायणी नदीलगतच्या दुतर्फा नागरिकांसह भाविकांना या डासांच्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना डास चावल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. आळंदी नगर परिषद प्रशासनाने कुजलेली जलपर्णी तसेच नदीकिनाऱ्यालगत दुतर्फा वाढलेले गवत व झाडाझुडपांचे साम्राज्य हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीत कुजलेली व साचलेली जलपर्णी हटाव मोहीम राबविण्यासह जंतुनाशक फवारणी, नदीचे परिसरात धुरीकरण करण्याची मागणी ही नागरिकांनी केली आहे.डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीमडोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याची मोहीम राबविण्यात आली. या वेळी डेंग्यूच्या आजाराला कारणीभूत असलेल्या डासांच्या अळ्यांची ठिकाणे नष्ट करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस देवकाते, डॉ. बी. एन. दडस, आरोग्य सहायक व्ही. एन. घुले, एन. एस. ठोके, बी. डी. नातू, एन. एम. लकडे, आरोग्य सेवक एस. एस. गोरे, एस. एस. उपाध्ये, विजय जगताप, जे. एम. दळवी तसेच आशा कार्यकर्त्या या सर्व आरोग्य विभागाने गावात कंटेनर सर्व्हे, पाणी पुरवठा नियंत्रण, ओटी टेस्ट, ताप रुग्ण तपासणी केली. नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी पाणी साठवणारी भांडी घासून पुसून कोरडी व रिकामी करावीत, पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा, अशा सूचना गावकºयांना केल्या .

टॅग्स :indrayaniइंद्रायणीnewsबातम्या