शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच मागे घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 04:45 IST

लोकअदालतीत असाही न्याय; महिलेचे न्यायालयाचे खेटे वाचले

पुणे : तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र, जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले आणि फिर्यादी महिलेलाच न्यायालयात खेटे घालण्याची वेळ आली. त्यामुळे लोकअदालतीत गुन्हा मागे घेण्यात आला.प्रवासादरम्यान ९०० रुपये किमतीची सोन्याची पोत चोरीला गेल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेला गुन्ह्याची फिर्याद तब्बल ३७ वर्षांनी मागे घेतला. शनिवारी लोकन्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मिटवले. लक्ष्मीबाई सरडे (घटनेच्या दिवशीचे वय ३०, रा. सरडे वस्ती, लोणीकंद) या १७ जानेवारी १९८१ रोजी त्यांच्या आई मंजूबाई बबन राकसे व गावातील दोन महिलांसह भोसरी येथे राहणाºया त्यांच्या बहिणीकडे निघाल्या होत्या. येरवड्यात पीएमपीच्या स्टॉपवरून भोसरीसाठी बस पकडली. या प्रवासादरम्यान बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९०० रुपये किमतीची सोन्याची पोत चोरली. चोरी होत असताना सरडे यांना गळ्याजवळ कोणाचा तरी हात असल्याचे लक्षात आले होते. बस काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आईच्या मदतीने त्वरित संशय असलेल्या तीन व्यक्तींना पकडले. या प्रकरणात सरडे यांनी तक्रार दिली होती.फिर्यादीनुसार बादल सुंदर गागडे, विकास गुलचंद बागडे आणि सुरेश प्रसाद भाट (सर्व रा. सर्व्हे नंबर ८, येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती. त्यानुसार त्याचा तपास करून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. अद्याप ते हाती न आल्याने हागुन्हा प्रलंबित होता. त्यामुळे फिर्यादी यांनी तब्बल ३७ वर्षांनी हा गुन्हा लोक अदालतीमध्ये मागे घेतला. त्यामुळे हा खटला निकाली लागला. फिर्यादी यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे आणि रवींद्र कांबळे यांनी प्रयत्न केले.व्यवसायिकाच्या कुटुंबियांना ४५ लाखांची नुकसानभरपाईअपघातात मृत्यू झालेल्या फरशी बसविणा-या ठेकेदाराच्या कुटुंबियांना तब्बल ४५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरजित रामनरेश सिंग असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. त्यांची पत्नी, दोन मुले, आई-वडिलांनी अ‍ॅड. अनिल पटणी आणि अ‍ॅड. आशिष पटणी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.

समन्समुळे मुलाने बोलणे सोडलेगुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. खटल्याच्या संदर्भात एक दिवस फिर्यादी समन्स पाठविला होता. तो त्यांच्या मुलाच्या हाती लागला. न्यायालयातून समन्स आल्याचे पाहून तो फिर्यादीवरच चिडला. न्यायालयाची नोटीस आली म्हणजे आपल्या आईने काहीतरी चुकीचे काम केले, अशी भावना त्याचा मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने फिर्यादीबरोबर बोलणेच सोडून दिले होते, अशी माहिती सरकारी वकील वामन कोळी यांनी दिली. या प्रकारामुळे आजही न्यायालयीन कामकाजाबाबत भीती असल्याचे पुढे येते, असे कोळी म्हणाले. 

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे