शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

खडकवासल्याच्या पाणीवाटपात दुजाभाव, पाणीपुरवठा योजना धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:28 IST

खडकवासला कालव्याचे आवर्तन आले अन् बंद झाले; मात्र तरीही भादलवाडी, पळसदेव, पोंधवडी, मदनवाडी या तलावांत पाणी आलेच नाही.

पळसदेव : खडकवासला कालव्याचे आवर्तन आले अन् बंद झाले; मात्र तरीही भादलवाडी, पळसदेव, पोंधवडी, मदनवाडी या तलावांत पाणी आलेच नाही. त्यामुळे या तलावात पाणी सोडण्याबाबत दुजाभाव होत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.प्रत्येक वेळी या तलावात नावापुरते पाणी सोडण्यात येते. या वेळी मात्र खडकवासला कालव्याच्या आवर्तनामधून पाण्याचा एक थेंबही वरील तलावात आलेला नाही. त्यामुळे आम्ही कोणाचे काय केले, असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. चालू वेळी खडकवासला कालव्याचे आवर्तन आले. त्यामुळे तलावात पाणी येईल, अशी शेतकºयांची अपेक्षा होती; मात्र तलावांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. गावातील पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. शेतीचे झाले वाटोळ. ..आता प्यायला तरी पाणी येऊ द्या, ही लोकांची अपेक्षा आहे.गेल्या एक महिन्यापासून दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. तरीही जलसंपदा विभागाचे अधिकारी व तालुक्याचे लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन आहेत. संबंधित ग्रामपंचायतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा तलावांमध्ये पाणी आलेले नाही. त्यामुळे वरील सर्व तलाव कोरडे पडले आहेत.सध्याच्या परिस्थितीत तलावात पाण्याचा एक थेंबही नाही. पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. तरीही या कडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही जगावे की मरावे, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत दरवर्षी असते; मात्र या वर्षी पाणी नसल्याने एकही पक्षी आलेला नाही.

टॅग्स :Puneपुणे