शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : आंबेगाव तालुक्यातील भगतवाडी, पसारवाडी, असाणे, बेंढारवाडी तसेच काळवाडी ही गावे धोकादायक गावे म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : आंबेगाव तालुक्यातील भगतवाडी, पसारवाडी, असाणे, बेंढारवाडी तसेच काळवाडी ही गावे धोकादायक गावे म्हणून घोषित झाली आहेत. पावसाळा सुरू झाला की येथील गावकऱ्यांच्या काळजाचा ठाव सुटतो. छातीवर डोंगराचा भार घेऊन दररोज ही गावे उद्याचा दिवस सुखरूप उजाडावा, अशी प्रार्थना करून झोपी जात आहेत. या पाचही गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावे ही येथील गावकऱ्यांची गेल्या पाच वर्षांपासूनची मागणी आहे. सरकारी दरबारी अनेकदा या गावांच्या पुनर्वसनासाठी बैठका पार पडल्या. जागांचे सर्वेक्षण झाले. मात्र, अद्याप तरी या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कशाची वाट पाहात आहे, असा प्रश्न ग्रामस्थांडून व्यक्त होत आहे. आंबेगाव तालुक्यातील भगतवाडी, पसारवाडी, असाणे, बेंढारवाडी तसेच जांभोरी गावची काळवाडी या गावांना नैसर्गिक आपत्तीमुळे धोका निर्माण झाली आहे. माळीणची घटना घडल्यानंतर संभाव्य धोकादायक गावांचा सर्वेक्षण करण्यात आले. यात तालुक्यातील ही गावे अतिसंवेदनशील असल्याचे समोर आले. पाच वर्षांपासून या गावांमध्ये दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचणे यांसारख्या घटना घडत आहेत. बेंढारवाडी येथे जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या. काळवाडी येथे घरांना तडे गेले. या गावच्या वरील बाजूस आसणारा उंच डोंगर व त्यावरील अजस्त्र दगड कोणत्याही क्षणी सुटून गावावर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील रस्त्यावर अनेकदा दरडी कोसळल्या आहेत. दवर्षी पावसाळा सुरू होताच या धोकादायक गावांमध्ये हमखास कोणत्या ना कोणत्या घटना घडत असतात. दोन वर्षांपूर्वी बेंढारवाडी येथे दरड कोसळली. जमिनीला पडलेली भेग मोठी व रूंद झाली. या घटनेमुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने आंबेगावचे तत्कालीन तहसीलदार रवींद्र सबनिस, गटविकास अधिकारी डॉ. अतुल चिखले यांनी तातडीने या भागाची पाहणी करून बेंढारवाडीच्या पुनर्वसनाबाबत लवकरात लवकर हालचाली करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला.

आपत्ती निवारण कायदा २००५ अंतर्गत तहसील कार्यालय आंबेगाव येथे उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव यांच्या अध्यक्षतेखाली ३० ऑगस्ट २०१६ रोजी आढावा बैठक झाली. या बैठकीस सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने धोकादायक गावांची सद्यस्थिती व पुनर्वसनासाठी येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली. बेंढारवाडीच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी उपलब्ध केलेल्या जागेची प्राथमिक मोजणी करून जागेचा जीएसआयचा रिपोर्ट अहवाल घेण्याविषयी ठरविण्यात आले. येथील डिंभे धरणामुळे बाधित झालेली ३९ घरे व धोकादायक १६ घरांचे पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले. भगतवाडी येथील १३ कुटुंबे, पसारवाडी येथील २७ घरे, असाणे गावात १०० ते १२५ घरे आहेत. ग्रामपंचायतीला नोंदी आसणाऱ्या प्रत्यक्षात किती मिळकती आहेत. याचा आढावा घेऊन वस्तुनिष्ठ माहितीसह पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करण्याचे ठरविण्यात आले होते. जांभोरीची काळवाडी येथील नं.१ मधील ३४ घरे व नं. २ मधील १७ अशा एकूण ५१ घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे ठरविण्यात आले. या सर्व धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी आदिवासी शबरी घरकुल योजनेतून घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी त्या त्या गावातील ग्रामसेवकांना सूचित करण्यात आले होते.

चौकट

धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी पूर्वीच्या गावापासून जवळच नवीन योग्य जागा शोधणे, उपलब्ध जागेची मोजणी करून जीएसआय रिपोर्टनुसार योग्य असल्याची खात्री करणे, मूळ मालकाला त्या जागेचा योग्य मोबदला देणे, यांसारख्या अनेक अडचणींचा सामना करत धोकादायक गावांच्या पुनर्वसित गावठाणांसाठी जागेचे संपादन करणे, हे एक प्रशासनापुढे मोठे आवाहन असल्याचे मुद्दे समोर आले होते. या नंतर जवळपास पाच ते सहा वर्षे उलटूनही अद्याप आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन रखडले आहे. लवकरात लवकर या गावांचे पुवर्नसन न झाल्यास भविष्यात पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्याला माळीणसारख्या अप्रिय घटनेचा साक्षीदार होण्याची वेळ येणार आहे.

फोटो :

सोबत- फोटो,24 jully 2021 डिंभे पी१

(छायाचित्र- कांताराम भवारी)