शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

घाटरस्ते बनतायेत धोकादायक

By admin | Updated: August 8, 2016 01:29 IST

वरंधघाट व आंबडखिंड घाटात, भोर-पसुरे-पांगारी रस्ता, नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, भाटघर धरण भागातील रस्त्यांवर वारंवार डोंगरातील दगड

भोर : वरंधघाट व आंबडखिंड घाटात, भोर-पसुरे-पांगारी रस्ता, नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, भाटघर धरण भागातील रस्त्यांवर वारंवार डोंगरातील दगड, मातीच्या दरडी पडून घाट बंद होत आहेत. रस्त्याला भेगा पडून रस्ता खचत आहे. यामुळे तालुक्यातून जाणारे घाटरस्ते आणि राज्यमार्ग व जिल्हा मार्गांची दुरवस्था झाली आहे. घाटरस्ते धोकादायक झाले आहेत. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्याची आपत्कालीन व्यवस्था संथ गतीने काम करीत आहे. ती फक्त कागदावरच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महाड-पंढरपूर मार्गावरील हिर्डोशी गावाजवळ रात्रीच्या वेळी दरड कोसळल्याने भोरवरून महाडकडे सिमेंटने भरलेला एक ट्रक, दोन एसटी बस, बोलेरो,भाजीपाल्याचा टेंपो व एक कंटेनर रोडवर पडलेल्या दरडीच्या चिखलमातीत अडकून बसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. जीवितहानी झाली नाही. त्यामुळे महाड बाजूकडून येणारी संपूर्ण वाहतूक धारमंडप पांगरी-पसुरे मार्गे वळवण्यात आली होती. दुपारी ४ ते रात्री ३ वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन जे.सी.बी.च्या मदतीने रस्त्यावरील दरड काढण्याचे काम सुरु होते. दुसऱ्या दिवशी रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला होता.महाबळेश्वरला जाणा-या पर्यटाकांचा मार्ग...नीरा देवघर धरण, निसर्गरम्य परिसर, डोंगरातून पडणारे धबधबे, वेडीवाकडी वळणे घेत जाणारा वरंध घाट तर आंबड खिंड घाटातून पडणारे धबधबे, डोंगरावरून दिसणारे मनमोहक दृश्य, मांढरदेवीला जाणारे भाविक व पाचगणी, महाबळेश्वरला जाणारे अनेक पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. मात्र या रस्त्यावरील डोंगर कमकुवत झाल्याने वारंवार दरड पडत आहे. रस्ता खचत असून वाहतूक ठप्प होत आहे. यामुळे या दोन्ही घाटांतील वाहतूक धोकादायक झाल्याने घाटात वाहने थांबविण्यास विरोध होत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ती फक्त कागदावरच असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. खानापूर गावठाणाच्या ओढ्यावरील पुलाला पडले भगदाडनेरे : खानापूर (ता़ भोर) येथील गावठाणात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाला पुराच्या पाण्याने भगदाड पडले आहे. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पूल वाहून जाण्याची शक्यता आहे़सलग चार दिवस वीसगाव खोऱ्यात मुसळधार पावसाने थैमान मांडले आहे़ खानापूर परिसरात वीसगाव खोऱ्यातील चार ओढ्यांचे पाणी एकत्र येऊन खानापूर येथील ओढ्याला मिळते. खानापूर गावाजवळच मोठा ओढा असून या ओढ्यावर चार ते पाच फूट उंचीचा पूल बांधण्यात आला आहे़ मात्र या पुलाची उंची कमी असून काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे़ दरवर्षी परिसरातील चार ओढ्यांचे पाणी एकत्र येऊन या खानापूर गावच्या पुलावरून जात असते. यामुळे पुलाला भगदाड पडणे, पुलाच्या खालील भराव वाहून जाण्याने हा पूल धोक्याचा बनत चालला आहे़