शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिखल, ओसांडणाऱ्या कचराकुंड्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य ; आरोग्यासाठी धोक्याची घंटा..... !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:27 IST

पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कचराकुंड्या आहेत. त्या वेळच्यावेळी उचलल्या जात नाहीत, त्यामुळे कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असतो.

ठळक मुद्देऔषध फवारणीची मागणी : पावसाळी साथीच्या रोगांची भीती पावसाळी वातावरणामुळे डेग्यू आणि स्वाइन फ्लूची भीती

हडपसर : रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे काही ठिकाणी दलदल झाली आहे. या पावसाळी वातावरणात सार्वजनिक ठिकाणी तुडुंब भरुन वाहणाऱ्या कचरा कुंड्या ...त्यामुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी, वाढलेले डास, कीटक यांचे प्रमाण त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचराकुंड्या वेळच्यावेळी उचलून त्याठिकाणी औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कचरा आणि दलदल यामुळे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हडपसर, मगरपट्टा, भीमनगर, वैदूवाडी, साडेसतरानळी परिसरातून दोन कालवे वाहत आहेत. सध्या पाण्याचा प्रवाह बंद असल्यामुळे दोन्ही कालव्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाणगवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, काही ठिकाणी मलवाहिनीही कालव्यात सोडल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोकाट कुत्री आणि डुकरांचा वावर वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणे आणि कालवा कचऱ्याचे आगर बनले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे डास-मच्छरांची उगमस्थानेच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कचराकुंड्या आहेत. त्या वेळच्यावेळी उचलल्या जात नाहीत, त्यामुळे कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असतो. त्या ठिकाणी मोकाट कुत्री, जनावरे आणि डुकरे अन्न शोधण्यासाठी कचरा विस्कटतात. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरून हा कचरा नागरी वस्तीमध्ये जात असल्याने नागरिक त्रासले आहेत.                                              ......................डेग्यू आणि स्वाइन फ्लूची भीतीपावसाळी वातावरणमुळे स्वाइन फ्लूच्या एच-१ आणि एन-१ विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी जास्त दिवस साठवून ठेवल्यामुळे डेंग्यूचे विषाणू तयार होतात. पावसाळ्यामध्ये गाळमिश्रित पाणी येते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून पिण्याची गरज आहे                             ................अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या ओव्हरफ्लोपालिका प्रशानाने कचराकुंड्यामुक्त करण्यासाठी घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, उपनगर आणि परिसरात रस्त्यावरील कचराकुंड्या आजही ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. वानवडी आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वादामध्ये नागरिक भरडला जात आहे.                            ......................पावसाळी वातारणात बाहेर पडताना नाक, तोंड बांधून बाहेर पडावे.पाणी उकळून आणि गाळून पिण्यासाठी वापरावे. उघड्यावरील पदार्थ खावू नयेत. मच्छरदाणी वापरावी, आजाबाजूला पाण्याची डबकी साठू देवू नयेत. पाण्याचा निचरा करण्याविषयी प्रशासनाला माहिती द्यावी. मधुमेहाच्या रुग्णांनी जखम झाली, तर त्वरित उपचार करावेत. जखम बरी होईपर्यंत बाहेर गेल्यानंतर जखम ओली होणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुतखड्यासारखे आजार होण्याची शक्यता असते. कमीत कमी पाच लिटर पाणी पिण्याची गरज आहे.-डॉ. आशिषकुमार दोषी

टॅग्स :HadapsarहडपसरHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका