शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

धरणग्रस्तांनी रोखले जलवाहिनीचे काम

By admin | Updated: April 30, 2017 05:01 IST

अवघ्या बारा दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा पालकमंत्र्यांना विसर पडला काय ? असा सवाल करीत भामा आसखेड धरण होऊन कित्येक वर्ष लोटली तरीही धरणग्रस्तांचे

- रूपेश बुट्टेपाटील, आंबेठाण

अवघ्या बारा दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा पालकमंत्र्यांना विसर पडला काय ? असा सवाल करीत भामा आसखेड धरण होऊन कित्येक वर्ष लोटली तरीही धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, प्रश्न प्रलंबित असताना देखील शासनाने बळावर पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम पुढे चालूच ठेवले आहे. वारंवार विनंत्या करूनही आणि मंत्र्यांनी बैठक घेऊन देखील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर भामा आसखेड धरणाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या जलवाहिनीचे काम बंद पाडले. जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत काम पुढे होऊ देणार नाही असाही कडक पवित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.जोपर्यंत धरणग्रास्तांचे प्रलंबित प्रश्न सुटत नाही. घोषणा केल्याप्रमाणे रोख रकमेचा मोबदला मिळत नाही, त्यांना घरांची आणि जमिनीची नुकसान भरपाई मिळत नाही. तो पर्यंत काम होऊ देणार नाही. अगोदर मागण्या मान्य करा आणि खुशाल पाणी पुढे न्या अशी ठाम भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली आहे.मागील अनेक महिन्यांपासून भामा आसखेड धरणावरून टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम बंद आहे. हे काम लवकर सुरु करून पुणेकरांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी बारा दिवसांपूर्वी धरणाच्या परिसरात असणाऱ्या करंजविहीरे येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, जगदीश मुळीक, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह डजनभर अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक झाली होती आणि या बैठकीत प्रकल्पग्रस्त नागरिकांना दहा लाख रुपये देऊन त्यांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविले जातील असे सांगितले होते. परंतु यावेळी केलेली घोषणा केवळ गाजर असल्याचे प्रकल्पग्रस्त नागरिकांचे म्हणने आहे. कारण यापैकी कुठलीही मागणी मान्य न करता जलवाहिनीचे काम सुरु करण्यात आले. यामुळे चिडलेल्या नागरिकांनी जलवाहिनीचे सुरु असणारे काम बंद पाडले. नेत्यांची अळीमिळी... : बैठक ठरली फार्सतालुक्यातील सेना भाजपाचे नेते देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ब्र काढीत नसून केवळ आपल्या नेत्यांच्या आदेशाचे पालन करीत आहे. सत्तेत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्याकडून सोडविले जात नाही तर विरोधी असणारे कॉंग्रेस-आणि राष्ट्रवादीवाले तालुक्यात आहे किंवा नाही हेच शोधावे लागत आहे अशी परिस्थिती आहे. शेतकरयांसाठी सत्ता पणाला लावून रस्त्यावर उतरेल अशा नेत्याची खरी गरज असल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याकडून बोलले जात आहे.१२-१३ दिवसांपूर्वी भामा-आसखेड धरणावर शेतकऱ्यांची चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, जगदीश मुळीक, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अधिकारी वगार्ची बैठक झाली होती. परंतु ही बैठक म्हणजे केवळ फार्स ठरली असून या बैठकीत शेतकऱ्यांना बोलू देखील दिले नाही असा ठाम आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. केवळ आपले शासन सरकार किती शेतकरी प्रेमी आहे हे दाखविण्यासाठी ही बैठक घेतली गेल्याचे बोलले जात आहे. यातून निष्पन्न काही झाले नसून मंत्री आले, पाहुणचार घेतला आणि निघून गेले असेच या बैठकीचे वर्णन करावे लागेल असा नागरिकांचा सूर आहे.आमचेच धरण अन् आमचेच मरण!धरणात आमच्या जमिनी गेल्या पण धरणग्रस्तांचे प्रश्न अजून प्रलंबित आहेत. खातेदाराला केवळ दहा लाख रुपयांची रक्कम देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु एक गुंठा जमीन गेली त्याला दहा लाख आणि पाच एकर जमीन गेली त्याला दहा लाख हा तोडगा व्यवहार्य नाही. तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून आमचे हक्क अबाधित राहणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी देखील केवळ बघ्याची भूमिका घेत असून त्यांची भूमिका ठाम नसल्याने धरणही आमचे आणि मरणही आमचे अशी अवस्था झाली असल्याचे शेतकरी सांगत आहे.