शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

धरणे भरली, तरीही कपात, लोकप्रतिनिधींची बैठकीत चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 02:16 IST

एकवेळच पाणी मिळणार : लोकप्रतिनिधींची बैठकीत चुप्पी

पुणे : पुण्याच्या पिण्याच्या पाण्यावर अखेर जलसंपदाची कुºहाड पडलीच. मुंबईत गुरुवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्र्यांनी पुण्याच्या पाण्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्र्यांसह खासदार व आमदार बैठकीला उपस्थित होते; मात्र त्यांच्यापैकी कोणीही या निर्णयाला ना विरोध दर्शवला, ना हरकत घेतली.

पुणे शहराला सध्या रोज १ हजार ३५० एलएमडी (दशलक्ष लिटर) पाणी मिळते. ते जास्त असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून गेले काही महिने केला जात होता. त्यामुळे पुण्याच्या पाण्यावर संकट येणार, हे निश्चित होते. कालवा समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. आता पुण्याला दररोज फक्त १ हजार १५० एमएलडी पाणी मिळेल. त्याच पाण्यात पुण्याला भागवावे लागणार आहे. एकवेळ पाणी देण्याचा निर्णय घेऊन, तो अंमलात आणला तरच हे शक्य होणार आहे, तसा निर्णय प्रशासनाकडून लवकरच घेतला जाण्याची चिन्हे आहेत.

मंत्री महाजन यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्ह्यातील आमदार म्हणून अजित पवार यांच्यासह दत्ता भरणे, बाबूराव पाचर्णे, राहुल कुल आदी उपस्थित होते. पुणे शहरातील आमदार म्हणून फक्त मेधा कुलकर्णी या बैठकीला उपस्थित होत्या. अन्य आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती. खडकवासला धरण साखळीत (पानशेत, टेमघर वरसगाव) समाधानकारक पाणीसाठा आहे; मात्र त्या पुढील धरणांमध्ये आवश्यक तेवढा पाणीसाठा नाही. आहे तो साठा काटकसरीने वापरावा लागणार आहे, असे समर्थन पुण्याच्या पाण्यात कपात करताना करण्यात आले. त्यामुळे आता पुण्याच्या पाण्यात दररोज २०० एमएलडी म्हणजे, जवळपास १५ टक्के कपात होणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्याचे आमदार असलेले बापट किंवा कुलकर्णी यांनी बैठकीत यावर काहीही मत व्यक्त केले नाही. महापालिका आयुक्त सौरभ राव, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी हेही या वेळी उपस्थित होते.

या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेशही मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाला दिले; मात्र त्यासाठी किमान आठ दिवस लागण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. पुण्याची लोकसंख्या ३५ लाख आहे. फ्लोटिंग म्हणजे, जाणाऱ्या-येणाºयांची संख्या सुमारे ५ लाख आहे. अनेक ग्रामपंचायतींना पुणे शहराकडूनच पाणी दिले जाते. वर्षभरापूर्वी ११ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. त्यांना पाणी देण्याचीही जबाबदारी आता पुणे शहरावरच आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला उपलब्ध पाण्याचे समान वितरण करण्यासाठी नव्याने वेळापत्रक तयार करावे लागणार आहे.उपनगरांसमोर पाण्याचे संकटसध्या आहे ते पाणीच नीट मिळत नाही अशी महापालिकेच्या बहुसंख्य नगरसेवकांची ओरड आहे. विशेषत: येरवडा, वडगाव शेरी; तसेच धायरी, हडपसर अशा उपनगरांमधील नगरसेवकांची पाण्याबाबत कायम तक्रार असते. त्यात विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबरोबरच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचाही समावेश आहे. त्या सर्वांसमोरच या पाणीकपातीच्या निर्णयामुळे मतदारांचे समाधान कसे करायचे, असा अवघड प्रश्न उभा राहिला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी यातून मार्ग काढूच असा विश्वास व्यक्त केला. प्रशासन, पदाधिकारी अशी संयुक्त चर्चा झाल्यानंतरच काय तो मार्ग निघेल असे ते म्हणाले.कपात लगेच नाहीपुण्यासह सर्वांनाच पाणी मिळणे गरजेचे आहे. उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन कालवा समितीने निर्णयघेतला आहे. त्यामुळे आता जे पाणी शहराला मिळेल, त्याचे समान वितरण होईल. आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख आल्यानंतर, पक्षनेते, पदाधिकारी अशी संयुक्त बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. लगेचच उद्यापासून पाणी कपात नाही. नवे वेळापत्रक तयार करून ते जलसंपदाला दाखवले जाईल व त्यानंतर पाण्यात कपात होईल. मुक्ता टिळक, महापौर 

 

टॅग्स :Puneपुणे