शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

पाण्याचा वापर टाळत साजरी झाली दहीहंडी

By admin | Updated: September 7, 2015 04:42 IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बहुतांश दहीहंडी उत्सव मंडळांनी पाण्याचा वापर टाळून गोविंदा आला रे, गोविंदा आलाचा घोष करीत दहीहंडी उत्सव साजरा केला

पुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बहुतांश दहीहंडी उत्सव मंडळांनी पाण्याचा वापर टाळून गोविंदा आला रे, गोविंदा आलाचा घोष करीत दहीहंडी उत्सव साजरा केला. पाण्याऐवजी यंदा रंगेबेरंगी कागद, चमकी उडवली जात होती. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कमी फुटाचे थर उभारण्याकडे मात्र काही मंडळांकडून दुर्लक्ष करण्यात आले. सुवर्णयुग तरुण मंडळाची हंडी रात्री नऊ वाजता गणेश मित्र मंडळ कसबा पेठ यांनी फोडली, तर बाबू गेनू तरुण मंडळाची हंडी शिवतेज मंडळाने रात्री ९.४० ला फोडली.राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट गडद झाले आहे, या पार्श्वभूमीवर मंडळांनी दहीहंडी उत्सवामध्ये पाण्याचा वापर करणे टाळले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणींनी डीजेच्या तालावर मनमुराद नाचत आनंद लुटला. हे आनंदाचे क्षण सेल्फी काढून फोटोमध्ये साठविताना अनेकजण दिसून येत होते. अखिल डेक्कन मित्र मंडळ, आराधना स्पोर्ट क्लब यासह अनेक दहीहंडी मंडळांनी उत्सव साजरा केला. चित्रपट, मालिकांमधील अभिनेते, अभिनेत्रींचे आर्कषण यंदाही दिसून आले, विविध मंडळांच्या दहीहंडी उत्सवासाठी ‘बाहुबली’फेम तमन्ना भाटिया, ‘सिंघम’ फेम काजल अगरवालपासून ते स्पृहा जोशीसह अनेक तारकांनी हजेरी लावली. त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.वंदेमातरम संघटना व युवा फिनिक्स संघटनेच्यावतीने पुस्तकांच्या भिंती उभारून दहीहंडी साजरी करण्यात आली. या अंतर्गत दीड हजार पुस्तके जमविण्यात आली होती. सामाजिक भान जपलेज्ञानेश्वर पादुका चौकातील पोलीस मित्र संघटनेने यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव रद्द केला. अखिल बाणेर बालेवाडी-महाळुंगे दहीहंडी उत्सव समितीने दहीहंडी रद्द करुन वर्गणीतून येणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला. औैंध परिसरातील १२ सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घेतला. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना ऊबदार कपड्यांचे वाटप करून अनोखी दहीहंडी साजरी करण्यात आली.सुरक्षितेची काळजीबाजीराव रस्त्यावरील नातूबाग मित्र मंडळाने दहीहंडी संघांच्या सुरक्षितेसाठी खाली जाळी उभारली होती. दहीहंडी फोडताना एखादा गोविंदा पडला तरी तो जखमी होऊ नये, म्हणून अत्यंत अभिनव असा हा उपक्रम त्यांनी राबविला. मात्र काही ठिकाणी जास्त उंचीचे थर उभे करू नयेत, लहान मुलांचा वापर टाळावा, या न्यायालयाने दिलेल्या निर्देशाकडे मंडळांनी दुर्लक्ष केले.