शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कर्जमाफी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - दादासाहेब भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 02:53 IST

राज्यातील शेतक-यांना सन २०१७ पर्यंत थकीत कर्जाला माफी मिळाली पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे. कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.

टाकळी हाजी : राज्यातील शेतक-यांना सन २०१७ पर्यंत थकीत कर्जाला माफी मिळाली पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे. कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.कवठे येमाई (ता. शिरूर) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे बोलत होते.या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना उपजिल्हप्रमुख राम गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे, हिंगोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात, अविनाश रहाणे, तालुका प्रमुख अनिल काशिद, देवीदास दरेकर,पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, माजी सदस्य डॉ. कल्पना पोकळे, माजी सरपंच बबनराव पोकळे, किरण देशमुख, संदीप जठार, पोपट शेलार, लहू वागदरे, राजेश सांडभोर, मारुती वागदरे आदि उपस्थित होते.आढळराव पाटील म्हणाले, की सरकारची भूमिका ही बैलगाडा सुरू करणाºयांच्या विरोधातील असून, त्यासाठी लोकसभेत विधेयक मंजूर करावे लागणार आहे. ते झाले नाही तर शेवटी न्यायालयीन लढाईत बैलगाडामालकांसोबत राहून, न्याय मिळवून देऊ. काही लोक दुसºयांच्या कामाचे श्रेय घेत असून, पराग कारखाना कुणाचा आहे, हे समजण्याएवढी जनता खुळी नाही, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली.कवठे येमाई येथे आज राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते शिवसेनेने दोन रस्त्यांचे भूमिपूजन केले. त्याच कामांचे बुधवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिपूजन केले. त्यामुळे काम नेमके केले कुणी, असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :newsबातम्याPuneपुणे