शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडा; आदेश; बारामती परिमंडलाच्या अभियंत्यांना आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:42 IST

कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टिमेटम

बारामती : कोरोना काळात जोखीम पत्करुन अखंडित वीजपुरवठा करुनही वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल भरण्यास चालढकल केल्याने आर्थिक स्थिती बिकट बनल्याचे चित्र आहे. परिणामी महावितरण पुन्हा 'अ‍ॅक्शन मोड' मध्ये आले आहे. महावितरणने कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टिमेटम देत वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत.

बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके आणि सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. परिमंडलात एकूण २६ लाख ५६ हजार वीज ग्राहक आहेत. त्यातील ७ लाख ३५ हजार ५१२ हे कृषीपंपाचे आहेत. सप्टेंबर २०२० अखेर सर्व शेतककडे मिळून ८१४२ कोटींची थकबाकी होती. दरम्यान महाराष्ट्र शासनाने आणलेल्या कृषी धोरणांतर्गत २२२१ कोटी निर्लेखित करुन सुधारित थकबाकी ५९२० कोटी इतकी निश्चित झाली. कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरले तर उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होऊन शेतकऱ्यांना जवळपास ६६ टक्केची माफी मिळते. शिवाय भरणा झालेल्या रकमेतून ३३ टक्के गावपातळीवर व ३३ टक्के जिल्हापातळीवर विजेच्या पायाभूत कामावरच खर्च होणार आहे.

दरम्यान, एकूण शेतकरी ग्राहकांच्या तुलनेत केवळ १०.४२ टक्के (७६६८९) शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेत १२५ कोटींची थेट माफी मिळवली आहे. या सर्व शेतकऱ्यांना महावितरणने थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित सुध्दा केले आहे. तर बºयाच शेतकºयांनी थकबाकीपोटी अंशत: रक्कम भरली आहे अशा शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम तातडीने भरावी लागणार आहे. तसेच ज्यांनी आजवर योजनेचा लाभच घेतलेला नाही, त्यांनाही देय रक्कम भरावी लागेल, अन्यथा महावितरणला नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे.————————————————————घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडेही १३३८ कोटींची थकबाकीबारामती परिमंडलात शेती वगळून असलेल्या ग्राहकांमध्येही थकबाकीचे प्रमाण वाढलेले आहे. अशा विविध वर्गवारीतील ९ लाख ४२ हजार ७८३ ग्राहकांकडे १३३८ कोटी ६२ लाख रुपये थकले आहेत. यामध्ये घरगुतीचे ८ लाख १० हजार ग्राहक असून त्यांचेकडे १८३ कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथके स्थापन केली असून, सुट्टीच्या दिवशीही वसूली मोहीम सुरु राहणार असल्याने वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली जाणार आहेत. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा तातडीने भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या