शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडा; आदेश; बारामती परिमंडलाच्या अभियंत्यांना आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:42 IST

कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टिमेटम

बारामती : कोरोना काळात जोखीम पत्करुन अखंडित वीजपुरवठा करुनही वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल भरण्यास चालढकल केल्याने आर्थिक स्थिती बिकट बनल्याचे चित्र आहे. परिणामी महावितरण पुन्हा 'अ‍ॅक्शन मोड' मध्ये आले आहे. महावितरणने कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टिमेटम देत वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत.

बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके आणि सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. परिमंडलात एकूण २६ लाख ५६ हजार वीज ग्राहक आहेत. त्यातील ७ लाख ३५ हजार ५१२ हे कृषीपंपाचे आहेत. सप्टेंबर २०२० अखेर सर्व शेतककडे मिळून ८१४२ कोटींची थकबाकी होती. दरम्यान महाराष्ट्र शासनाने आणलेल्या कृषी धोरणांतर्गत २२२१ कोटी निर्लेखित करुन सुधारित थकबाकी ५९२० कोटी इतकी निश्चित झाली. कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरले तर उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होऊन शेतकऱ्यांना जवळपास ६६ टक्केची माफी मिळते. शिवाय भरणा झालेल्या रकमेतून ३३ टक्के गावपातळीवर व ३३ टक्के जिल्हापातळीवर विजेच्या पायाभूत कामावरच खर्च होणार आहे.

दरम्यान, एकूण शेतकरी ग्राहकांच्या तुलनेत केवळ १०.४२ टक्के (७६६८९) शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेत १२५ कोटींची थेट माफी मिळवली आहे. या सर्व शेतकऱ्यांना महावितरणने थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित सुध्दा केले आहे. तर बºयाच शेतकºयांनी थकबाकीपोटी अंशत: रक्कम भरली आहे अशा शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम तातडीने भरावी लागणार आहे. तसेच ज्यांनी आजवर योजनेचा लाभच घेतलेला नाही, त्यांनाही देय रक्कम भरावी लागेल, अन्यथा महावितरणला नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे.————————————————————घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडेही १३३८ कोटींची थकबाकीबारामती परिमंडलात शेती वगळून असलेल्या ग्राहकांमध्येही थकबाकीचे प्रमाण वाढलेले आहे. अशा विविध वर्गवारीतील ९ लाख ४२ हजार ७८३ ग्राहकांकडे १३३८ कोटी ६२ लाख रुपये थकले आहेत. यामध्ये घरगुतीचे ८ लाख १० हजार ग्राहक असून त्यांचेकडे १८३ कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथके स्थापन केली असून, सुट्टीच्या दिवशीही वसूली मोहीम सुरु राहणार असल्याने वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली जाणार आहेत. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा तातडीने भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या