शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सध्याचे मुस्लीम मूळ भारतीय, त्यांच्यासाठी वेगळे कायदे लागू होऊ नयेत - सय्यदभाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 06:45 IST

सय्यदभाई हे पुण्याचे रहिवासी असून त्यांनी समाजसुधारक हमीद दलवाई यांच्यासोबत मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

पुणे : देशात कायदे करताना ते धर्माच्या आधारावर नाही तर समानतेच्या आधारावर बनवावेत असे मत नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या सय्यदभाई यांनी व्यक्त केले.पद्मश्री जाहीर झाल्यावर त्यांनी लोकमत'शी बातचीत केली. यावेळी बोलताना त्यांनी देशात गाजणाऱ्या सीएए आणि एनआरसी'च्या मुद्द्यांवरही मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, सध्याचे मुस्लिम मूळ भारतातले आहेत. ज्यांना बाहेर जायचे होते ते पूर्वीच फाळणीत देशाच्या बाहेर गेले. आता हे राहिलेत ते मूळ भारतीय आहेत त्यांना कोणत्याही स्थितीत वेगळे कायदे लागू होऊ नयेत असे मला वाटते. दरम्यान, सय्यदभाई हे पुण्याचे रहिवासी असून त्यांनी समाजसुधारक हमीद दलवाई यांच्यासोबत मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्याअंतर्गत त्यांनी मुस्लिम महिलांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा दिला.

देशात मागील वर्षी लागू झालेला ट्रीपला तलाक कायदा हे त्यांच्याच लढ्याचे फळ मानले जाते. वयाच्या 83व्या वर्षीही ते त्यांना आपले काम वाढवण्याची इच्छा आहे. व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास अख्तर सय्यद यांच्याशी त्यांचा 56 वर्षांपूर्वी निकाह झाला. अख्तर स्वतः पुरोगामी विचारांच्या पुरस्कर्त्या असून त्यांना तितकेसे शिक्षण मिळाले नाही. आणि म्हणूनच त्या सय्यदभाईंच्या मागे पहाडासारख्या उभ्या राहिल्या. या पुरस्कारात तिचा सिंहाचा वाटा असल्याचे सय्यदभाई सांगतात.

(बहिणीसाठी भाऊ पेटून उठतो तेव्हा...; पद्मश्री मिळालेल्या सय्यदभाईंच्या संघर्षाची कहाणी!)

टॅग्स :Puneपुणे