शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

...तर पुण्याची संस्कृती संवादी होईल - श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:13 IST

पुण्यात विविध साहित्य चळवळीची केंद्रे सक्रिय आहेत. मध्यमवर्गीय, प्रस्थापित, विस्थापित, विद्रोही अशा विविध साहित्य चळवळींचे समर्थन करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. पुण्यात एकीकडे कीर्तन परंपरा, तर दुसरीकडे लावणी परंपराही रुजली आहे.

पुण्यात विविध साहित्य चळवळीची केंद्रे सक्रिय आहेत. मध्यमवर्गीय, प्रस्थापित, विस्थापित, विद्रोही अशा विविध साहित्य चळवळींचे समर्थन करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. पुण्यात एकीकडे कीर्तन परंपरा, तर दुसरीकडे लावणी परंपराही रुजली आहे. बहुजन आणि अभिजन कलेला समान स्थान मिळते. शास्त्रीय गायन, शाहिरी, पोवाडा, लोकसंगीत अशा सर्व सांस्कृतिक प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारी परंपरा पुण्याने जपली आहे. शेतकरी, कामगार, समाजवादी, कलावंत, आंबेडकरी चळवळीचे, विविध राजकीय संस्कृतीचे नेते, विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना आणि कार्यकर्त्यांची पुणे ही कर्मभूमी आहे. मानवतावाद, सेवाभाव, राष्ट्रवाद अशा प्रकारे पुण्याची संस्कृती सर्व टोकांच्या विचारांना पेलणारी आहे.पुण्याला साहित्याची समृद्ध आणि प्राचीन परंपरा लाभली आहे. बहुजन, अभिजन, दलित, ग्रामीण, आदिवासी, मुुस्लिम अशा सर्व साहित्य प्रवाहांनी पुण्याच्या साहित्य चळवळीमध्ये मोलाची भर घातली आहे. अनेक साहित्यिकांनी, लेखकांनी, विचारवंतांनी हा साहित्याचा वारसा पुण्यात पेरला, रुजवला आणि जोपासला. समृद्ध साहित्याचा वारसा लाभलेल्या या शहारत मी जाती-धर्माच्या पलीकडची धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन पुण्यात आलो आणि रमलो. लेखक, समीक्षक, साहित्य संमेलनाध्यक्ष अशा विविध भूमिकांमधून प्रवास करत असताना पुरोगामी चळवळीतील बहुसंख्य प्रवाहांनी माझी भूमिका समजून आणि पचवून घेतली. मात्र, टोकाच्या उजव्या प्रवाहात या भूमिकेचे पडसाद फारसे उमटलेले दिसले नाहीत.साहित्य चळवळीतील माझी भूमिका संवाद आणि समन्वयाची आहे. कोणतीही विचारधारा माझी शत्रू नाही. मात्र, मी मतभेदांचे स्वातंत्र्य देतो आणि घेतो. भारतीय लोकशाहीची संकल्पना परस्परांचे स्वातंत्र्य जपणारी, बंधुत्वावर आधारलेली आहे. बंधुत्वाशिवाय समतेचा विचार होऊच शकत नाही. बंधुत्व हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. माझाही बंधुभावनेवर जास्त भर देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, पुण्याच्या संस्कृतीमध्ये बंधुत्व काहीसे उपेक्षित राहिले आहे, असे वाटते. पुण्याची संस्कृती सर्वसमावेशक करायची असेल तर परस्परविरोधी संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये संवादाचे जाहीर कार्यक्रम व्हायला हवे. पटलेल्या मुद्द्यावर संवाद आणि उरलेल्या मुद्द्यांवर संघर्ष, त्यातून समन्वयाकडे वाटचाल ही भूमिका पुणेकरांनी स्वीकारण्याची गरज आहे.साहित्यिक विविध चळवळी, प्रवाहांमध्ये विभागले गेले आहेत. सर्व साहित्य प्रवाहात माणूस हा समान धागा असला पाहिजे. परस्परांचे प्रश्न आणि दु:ख साहित्यातून समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. साहित्य चळवळ सर्वव्यापी, सर्वसमावेशक करताना विद्रोही आणि प्रस्थापित साहित्यातील भेदरेषा संपली पाहिजे. संवाद निर्माण होऊन हा ह्यभेद संपुष्टात यावा, यासाठी साहित्यिकांनीआणि पुण्यातील साहित्यिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. लेखक, कवी, कलावंतांनी स्वत:मध्ये निर्माण केलेल्या गटातटाच्याभिंती पाडाव्यात. साहित्यात सामान्य माणूस केंद्रस्थानी असला पाहिजे. सर्वार्थाचे कल्याणहा साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारणाचा ध्येयवाद असायला हवा. व्यक्तिवाद, जातीवाद, वंशवाद, धर्मवाद हे सर्व संकुचित वाद बाजूलाकरून संवादाची भूमिका स्वीकारल्यास सांस्कृतिक संचित जपले जाईल.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकnewsबातम्या