शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

खानापूर पाणवठ्यावर आढळले मगरीचे पिल्लू; राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात केले सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 11:17 IST

काही वर्षांपूर्वी खडकवासला धरण क्षेत्रात मगर आढळून आली हाेती.

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये खानापूर गावातील पाणवठ्याजवळ एक मगरीचे पिल्लू आढळले असून, ते पाण्याबाहेर आल्याने निसर्गप्रेमींनी त्याला वन विभागाच्या हाती सुपूर्द केले. उपचारासाठी ते राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिले आहे. ते थोडं मोठं झाल्यावर पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी खडकवासला धरण क्षेत्रात मगर आढळून आली हाेती. त्यानंतर आता हे एक चार महिन्यांचे पिल्लू दिसले आहे. खानापूर परिसरातील बॅकवॉटरमध्ये मगरीचे प्रजनन होत असल्याने त्या ठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे. परंतु, त्यांनी कधीही कोणावर हल्ला केलेला नाही. याविषयी ‘पीआरटी’ पथकाचे तानाजी भोसले, अक्षय जाधव, धवल तुडमवार व सूरज कवडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर व्यास संस्थेचे मनोज वाल्हेकर यांनीदेखील त्यांना मदत केली.

तानाजी भोसले यांचे वन्यजीव बचाव पथक हे गेली अनेक वर्षांपासून वन्यजीव संरक्षणासाठी काम करते. ते म्हणाले,‘‘मगरी एका वेळी पन्नासहून अधिक अंडी देतात, पण त्यातील सर्वच पिल्लं जगत नाहीत. त्यातील काही अंडी इतर वन्यजीव खातात किंवा काही फुटतात. जर ही पिल्लं मगरीजवळच राहिली तर ती जगतात. ती तर आईपासून दूर गेली, तर त्यांना मोठे मासे खाऊन टाकतात किंवा इतर जीव मारून टाकतात. ’’

हे चार महिन्यांचे पिल्लू बॅकवॉटरच्या बाहेर आलेले होते. त्यामुळे परत तिथेच सोडले असते तर ते वाचले नसते. म्हणून त्याला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सोडले. काही महिने तिथे मोठे झाल्यावर त्याला पुन्हा निसर्गात सोडता येते.

- तानाजी भोसले, वन्यजीव संरक्षक

खडकवासला धरणक्षेत्राच्या ज्या परिसरात मगरींचे वास्तव्य आहे, तिथे सूचनाफलक लावणे आवश्यक आहे. या मगरींचा कोणाला त्रास होत नसला तरी नागरिक त्या परिसरात जाऊ नयेत, म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.

- सुनील पिसाळ, वन्यजीव संरक्षक

टॅग्स :Puneपुणे