शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

खानापूर पाणवठ्यावर आढळले मगरीचे पिल्लू; राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात केले सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 11:17 IST

काही वर्षांपूर्वी खडकवासला धरण क्षेत्रात मगर आढळून आली हाेती.

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये खानापूर गावातील पाणवठ्याजवळ एक मगरीचे पिल्लू आढळले असून, ते पाण्याबाहेर आल्याने निसर्गप्रेमींनी त्याला वन विभागाच्या हाती सुपूर्द केले. उपचारासाठी ते राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिले आहे. ते थोडं मोठं झाल्यावर पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी खडकवासला धरण क्षेत्रात मगर आढळून आली हाेती. त्यानंतर आता हे एक चार महिन्यांचे पिल्लू दिसले आहे. खानापूर परिसरातील बॅकवॉटरमध्ये मगरीचे प्रजनन होत असल्याने त्या ठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे. परंतु, त्यांनी कधीही कोणावर हल्ला केलेला नाही. याविषयी ‘पीआरटी’ पथकाचे तानाजी भोसले, अक्षय जाधव, धवल तुडमवार व सूरज कवडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर व्यास संस्थेचे मनोज वाल्हेकर यांनीदेखील त्यांना मदत केली.

तानाजी भोसले यांचे वन्यजीव बचाव पथक हे गेली अनेक वर्षांपासून वन्यजीव संरक्षणासाठी काम करते. ते म्हणाले,‘‘मगरी एका वेळी पन्नासहून अधिक अंडी देतात, पण त्यातील सर्वच पिल्लं जगत नाहीत. त्यातील काही अंडी इतर वन्यजीव खातात किंवा काही फुटतात. जर ही पिल्लं मगरीजवळच राहिली तर ती जगतात. ती तर आईपासून दूर गेली, तर त्यांना मोठे मासे खाऊन टाकतात किंवा इतर जीव मारून टाकतात. ’’

हे चार महिन्यांचे पिल्लू बॅकवॉटरच्या बाहेर आलेले होते. त्यामुळे परत तिथेच सोडले असते तर ते वाचले नसते. म्हणून त्याला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सोडले. काही महिने तिथे मोठे झाल्यावर त्याला पुन्हा निसर्गात सोडता येते.

- तानाजी भोसले, वन्यजीव संरक्षक

खडकवासला धरणक्षेत्राच्या ज्या परिसरात मगरींचे वास्तव्य आहे, तिथे सूचनाफलक लावणे आवश्यक आहे. या मगरींचा कोणाला त्रास होत नसला तरी नागरिक त्या परिसरात जाऊ नयेत, म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.

- सुनील पिसाळ, वन्यजीव संरक्षक

टॅग्स :Puneपुणे