शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा डाव, अजित पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:42 IST

सहकारी संस्थांवर ताबा मिळविण्यासाठी राज्य सरकार सहकाराची नियमावली बदलू पाहत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र धोक्यात येणार आहे.

बारामती : सहकारी संस्थांवर ताबा मिळविण्यासाठी राज्य सरकार सहकाराची नियमावली बदलू पाहत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र धोक्यात येणार आहे. सहकार तत्त्वावर चालणाºया बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संगणकीय लिलाव प्रणालीचे उद्घाटन, जळोची उपबाजारातील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.या वेळी पवार म्हणाले, की सहकारमंत्र्यांना त्यांच्या गावात बाजार समिती आपल्याकडे घेता येत नसल्याने त्यांनी हा निर्णय आतताईपणे घेतला आहे. शासनाच्या नवीन धोरणामुळे यापुढील काळात फक्त १५ संचालकांना संधी मिळेल. समितीत शेतमाल आणणाºया प्रत्येक शेतक-याला या निर्णयामुळे मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला विधानसभेचे स्वरूप येईल. यापूर्वी वेगवेगळ्या गटांतून बाजार समितीवर सर्व घटकांना संधी मिळत असल्याने अनेकांना सामावून घेणे शक्य होत असे. मात्र, शासनाच्या नवीन धोरणामुळे यापुढील काळात केवळ १५ संचालकांना संधी देणे शक्य होईल.या निर्णयामुळे ज्या समित्यांची निवडणूक घेण्याची ऐपत नाही, तेथे प्रशासक नेमून सरकार त्यांना हवा तसा कारभार करेल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.शेतमाल विक्रीची रक्कम आॅनलाइन पद्धतीने शेतकºयांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठीप्रयत्न करणे गरजेचे आहे. जनावरांच्या बाजारात सुपे येथील उपबाजारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षांचा दहा कोटींचा कृती आराखडा समितीने तयार केला असल्याचे पवार यांनी सांगितले.या वेळी प्रास्ताविक करताना समितीचे सभापती रमेशराव गोफणे म्हणाले, की या प्रणालीसाठी १ कोटीचा खर्च आला आहे.हे काम १०० टक्के अनुदानातून जागतिक बँक अर्थसाहाय्यातून करण्यात आले आहे. भविष्यात या पद्धतीमुळे शेतकºयास दर वाढवून मिळतील. स्वागत सचिव अरविंद जगताप यांनी केले.उपसभापती विठ्ठलराव खैरे यांनी आभार मानले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते अध्यक्षस्थानी होते.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, इम्तियाज शिकिलकर, पोपटराव तुपे, अमोल वाडीकर,शंकरराव सरक,बाजार समिती संचालक बाळासोा गावडे, दिलीप जगताप, प्रताप सातव, अनिल खलाटे,राजेंद्र बोरकर,बाळासाहेब पोमणे,रत्नाबाई चौधरी,शशिकला वाबळे, वसंत गावडे, दत्तात्रय सणस, शौकत कोतवाल, नारायण कोकरे, बापट कांबळे, अनिल हिवरकर, नितीन सरक, पोपट खैरे, दिलीप खोमणे आदी या वेळी उपस्थित होते.संगणकीय लिलाव प्रणालीमुळे बाजार समिती राज्यातपहिल्या क्रमांकाची होणार आहे. बाजार समिती आणि शेतकरी, व्यापाºयांमध्ये पारदर्शकता येणार आहे. या प्रणालीचा शेतकरी, व्यापाºयांना फायदा होणार आहे. शेतकºयांना इतर समितीतील बाजारभाव समजणार आहेत. व्यापारी आॅनलाइन पद्धतीने माल घेतील. मालाची प्रतवारी केली जात नाही, तोपर्यंत या प्रणालीत भाग घेण्यास काही मर्यादा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी