शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

दंगे घडणे हे राज्यांचे अपयश , विभूती नारायण राय यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 04:11 IST

राष्ट्रीय पोलीस अकादमीकडे या दंगलींच्या अभ्यासाचा अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवाल प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली.

पुणे - राष्ट्रीय पोलीस अकादमीकडे या दंगलींच्या अभ्यासाचा अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवाल प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली. या अभ्यासावरून पोलीस दलात काहीतरी बदल होईल असे वाटले होते; मात्र पोलीस दलाने या अभ्यासाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची खंत माजी पोलीस महासंचालक विभूती नारायण राय यांनी व्यक्त केली. तसेच, दंगे घडणे हे राज्यांचे मोठे अपयश असून, राज्यांना दंगलीची जबाबदारी घ्यावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.लोकवाङमय गृहतर्फे विभूती नारायण राय यांच्या विजय दर्प यांनी अनुवादित केलेल्या ‘जमातवादी दंगली आणि भारतीय पोलीस’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राय बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र कानगो, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. शशिकला राय आणि विजय दर्प उपस्थित होते. राय म्हणाले, ज्यावेळी समाजात दंगली घडतात, तेव्हा लोकांचा पोलिसांवरचाच नव्हे तर राज्यकर्त्यांवरचाही विश्वास उडतो. १६०९ मध्ये देशात पहिला जातीय दंगा झाल्याची नोंद आहे. १७०३ मध्ये बनारस येथे दंगा झाला होता. जातीय दंग्यात खाकी कपड्यातील पोलीस राज्याचे प्रतिनिधित्व करत असतो. पोलीस चांगले वर्तन करत असेल तर देश चांगले वर्तन करतो असे समजावे. राष्ट्रीय पोलीस अकादमीने मला १९९४ मध्ये शिष्यवृत्ती दिली. देशातील १० जातीय दंग्यांची निवड केली. माझ्या अभ्यासाचा अहवाल अकादमीकडे सादर केला. मात्र, त्यांनी तो प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली. या अहवालातून पोलीस दलात सुधारणा होईल असे वाटले होते मात्र तसे झाले नाही. २००४ मध्ये गुजरात दंगे घडले. मुस्लिम दंग्याची सुरुवात करतो, असा समज आहे; मात्र दंगलींमध्ये मुस्लिम सर्वाधिक बळी पडले आहेत. सरकारी आकडे कितपत विश्वासार्ह आहेत ते तपासायला हवे. ३० टक्के अल्पसंख्याक समाजाचा पोलिसांवर विश्वास नसेल तर हा देश कसा प्रगती करेल, दंगे हे राज्याचे अपयश आहे संविधान धोक्यात आहे. निवडणुकांच्या काळात जनताही आम्हाला स्वच्छ पोलीस हवा अशी मागणी का करीत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.दंगली का घडतात? याबद्दल चर्चा कुणीच करीत नाही, असे सांगून अशोक धिवरे यांनी दंगलीमागच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला. हिंसाचारातून दुसऱ्या समाजामध्ये पूर्वग्रहदृष्टिकोन तयार केला जातो. दंगलीतून भावनिक व बौद्धिक स्तरावर निर्माण केल्या जातात. हिंसेचे तर्क हे कालसापेक्ष असते. दंगली मुस्लिम सुरू करतात हे पसरवले जाते.बºयाच घटना या परिस्थितीशी विसंगत असतात, त्याच्यामागे धार्मिकता हेच कारण असते. दंगली या नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केल्या जातात. यातच दंगलींमध्ये पोलिसांचे वर्तन हे पक्षपाती असते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.यासाठी पोलीस दलात अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढले पाहिजे. पोलिसांना सर्वधर्मसमभावाबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. राज्यात दंगली घडल्या, तर फौजदाराला गुन्हेगार ठरवले जाते. पण, जिल्हाधिकाºयाला शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. यासाठी दंगलीची जबाबदारी निश्चित करून त्याला संविधानिक रूप देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कानगो म्हणाले, ‘अल्पसंख्याक समाजाला पोलीस समाजाचे ऐकतात असे वाटते, तर अल्पसंख्याक समाजाचे लाड केले जातात असे बहुसंख्याक लोकांना वाटते, हा तिढा कसा सोडवणार?’ हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या