शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:09 IST

पुणे : आजुबाजूचे जग वेगाने बदलत असताना लहान मुलांच्या भावनिक, मानसिक विश्वातही बरीच उलथापालथ होत आहे. कुटुंबासह राहणारी मुले ...

पुणे : आजुबाजूचे जग वेगाने बदलत असताना लहान मुलांच्या भावनिक, मानसिक विश्वातही बरीच उलथापालथ होत आहे. कुटुंबासह राहणारी मुले मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही आकडेवारी पालकांच्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. कौटुंबिक संवाद, निसर्गाशी गट्टी, वाचनाची आवड, छंदांचा पाठलाग, नातेवाईकांविषयी आपुलकी आणि माणुसकीचा ओलावा मुलांना तारु शकेल, असे मत समुपदेशकांकडून नोंदवले जात आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार बेघर किंवा निराधार मुलांपेक्षा घरात कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांमधील बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बेघर आणि निराधार मुलांमधील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाले आहे, ही सुखद बातमी आहे. पण कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांमधली वाढती गुन्हेगारी ही चिंतेचे कारण आहे. एकूण बाल गुन्हेगार आरोपी ६४५४ आहेत. त्यातले आई -वडिलांबरोबर राहणा-या मुलांनी केलेले गुन्हे ५८३४ आहेत.

मुलांना वेळ देता येत नसेल तर त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करण्याचा पर्याय पालक स्वीकारतात. महागड्या वस्तू वापरण्याची आणि सर्व हट्ट पुरवून घेण्याची सवय लागल्याने मुलांना नकार पचवण्याची सवय राहत नाही. मग एखाद्या गोष्टीला नकार मिळाल्यास ती कोणत्याही पध्दतीने मिळवण्याची त्यांची धडपड सुरु होते. अशा काळात पालकत्व निभावण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. मुलांचा वयोगट, गुन्हेगारीचा प्रकार याबाबत अधिक तपशीलात अभ्यास करुन त्यानंतर योग्य निष्कर्ष काढता येतील, असे जाणकारांचे मत आहे.

------------

मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढतेय, याचा मुळापर्यंत जाऊन विचार करावा लागणार आहे. केवळ पालकांना किंवा मुलांना दोष देऊन चालणार नाही. दोन्ही बाजू समजून घेऊन, बारकाईने विचार करुन मार्ग शोधावा लागेल. घरात संवादाचा अभाव, अतिलाड, भावनिक-मानसिक असुक्षितता, हातात खुळखुळणारा पैसा अशा अनेक कारणांचा विचार करावा लागेल.

- श्रुती पानसे, समुपदेशक

----------------------

कोणत्या वयोगटातील मुले काय कारणाने कोणत्या स्वरुपाचे गुन्हे करत आहेत, त्यांचे राहणीमान या सर्व बाबींची सखोल माहिती समोर आल्याशिवाय निष्कर्ष काढणे अवघड आहे. मुले विघातक दिशेला जाऊ नयेत, यासाठी पालकांचे मुलांवर लक्ष असायला हवे. मुलांचे लाड करण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. मुले जन्मत:च सर्व काही शिकून येत नाहीत. आपण त्यांना काय शिकवतो, कसे वातावरण देतो, अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. पालकांनी आपली जबाबदारी जबाबदारीने पार पाडायला हवी.

- डॉ. भूषण शुक्ला, बालमानसोपचारतज्ज्ञ