शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:09 IST

पुणे : आजुबाजूचे जग वेगाने बदलत असताना लहान मुलांच्या भावनिक, मानसिक विश्वातही बरीच उलथापालथ होत आहे. कुटुंबासह राहणारी मुले ...

पुणे : आजुबाजूचे जग वेगाने बदलत असताना लहान मुलांच्या भावनिक, मानसिक विश्वातही बरीच उलथापालथ होत आहे. कुटुंबासह राहणारी मुले मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही आकडेवारी पालकांच्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. कौटुंबिक संवाद, निसर्गाशी गट्टी, वाचनाची आवड, छंदांचा पाठलाग, नातेवाईकांविषयी आपुलकी आणि माणुसकीचा ओलावा मुलांना तारु शकेल, असे मत समुपदेशकांकडून नोंदवले जात आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार बेघर किंवा निराधार मुलांपेक्षा घरात कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांमधील बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बेघर आणि निराधार मुलांमधील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाले आहे, ही सुखद बातमी आहे. पण कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांमधली वाढती गुन्हेगारी ही चिंतेचे कारण आहे. एकूण बाल गुन्हेगार आरोपी ६४५४ आहेत. त्यातले आई -वडिलांबरोबर राहणा-या मुलांनी केलेले गुन्हे ५८३४ आहेत.

मुलांना वेळ देता येत नसेल तर त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करण्याचा पर्याय पालक स्वीकारतात. महागड्या वस्तू वापरण्याची आणि सर्व हट्ट पुरवून घेण्याची सवय लागल्याने मुलांना नकार पचवण्याची सवय राहत नाही. मग एखाद्या गोष्टीला नकार मिळाल्यास ती कोणत्याही पध्दतीने मिळवण्याची त्यांची धडपड सुरु होते. अशा काळात पालकत्व निभावण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. मुलांचा वयोगट, गुन्हेगारीचा प्रकार याबाबत अधिक तपशीलात अभ्यास करुन त्यानंतर योग्य निष्कर्ष काढता येतील, असे जाणकारांचे मत आहे.

------------

मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढतेय, याचा मुळापर्यंत जाऊन विचार करावा लागणार आहे. केवळ पालकांना किंवा मुलांना दोष देऊन चालणार नाही. दोन्ही बाजू समजून घेऊन, बारकाईने विचार करुन मार्ग शोधावा लागेल. घरात संवादाचा अभाव, अतिलाड, भावनिक-मानसिक असुक्षितता, हातात खुळखुळणारा पैसा अशा अनेक कारणांचा विचार करावा लागेल.

- श्रुती पानसे, समुपदेशक

----------------------

कोणत्या वयोगटातील मुले काय कारणाने कोणत्या स्वरुपाचे गुन्हे करत आहेत, त्यांचे राहणीमान या सर्व बाबींची सखोल माहिती समोर आल्याशिवाय निष्कर्ष काढणे अवघड आहे. मुले विघातक दिशेला जाऊ नयेत, यासाठी पालकांचे मुलांवर लक्ष असायला हवे. मुलांचे लाड करण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. मुले जन्मत:च सर्व काही शिकून येत नाहीत. आपण त्यांना काय शिकवतो, कसे वातावरण देतो, अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. पालकांनी आपली जबाबदारी जबाबदारीने पार पाडायला हवी.

- डॉ. भूषण शुक्ला, बालमानसोपचारतज्ज्ञ