शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:09 IST

पुणे : आजुबाजूचे जग वेगाने बदलत असताना लहान मुलांच्या भावनिक, मानसिक विश्वातही बरीच उलथापालथ होत आहे. कुटुंबासह राहणारी मुले ...

पुणे : आजुबाजूचे जग वेगाने बदलत असताना लहान मुलांच्या भावनिक, मानसिक विश्वातही बरीच उलथापालथ होत आहे. कुटुंबासह राहणारी मुले मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही आकडेवारी पालकांच्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. कौटुंबिक संवाद, निसर्गाशी गट्टी, वाचनाची आवड, छंदांचा पाठलाग, नातेवाईकांविषयी आपुलकी आणि माणुसकीचा ओलावा मुलांना तारु शकेल, असे मत समुपदेशकांकडून नोंदवले जात आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार बेघर किंवा निराधार मुलांपेक्षा घरात कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांमधील बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बेघर आणि निराधार मुलांमधील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाले आहे, ही सुखद बातमी आहे. पण कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांमधली वाढती गुन्हेगारी ही चिंतेचे कारण आहे. एकूण बाल गुन्हेगार आरोपी ६४५४ आहेत. त्यातले आई -वडिलांबरोबर राहणा-या मुलांनी केलेले गुन्हे ५८३४ आहेत.

मुलांना वेळ देता येत नसेल तर त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करण्याचा पर्याय पालक स्वीकारतात. महागड्या वस्तू वापरण्याची आणि सर्व हट्ट पुरवून घेण्याची सवय लागल्याने मुलांना नकार पचवण्याची सवय राहत नाही. मग एखाद्या गोष्टीला नकार मिळाल्यास ती कोणत्याही पध्दतीने मिळवण्याची त्यांची धडपड सुरु होते. अशा काळात पालकत्व निभावण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. मुलांचा वयोगट, गुन्हेगारीचा प्रकार याबाबत अधिक तपशीलात अभ्यास करुन त्यानंतर योग्य निष्कर्ष काढता येतील, असे जाणकारांचे मत आहे.

------------

मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढतेय, याचा मुळापर्यंत जाऊन विचार करावा लागणार आहे. केवळ पालकांना किंवा मुलांना दोष देऊन चालणार नाही. दोन्ही बाजू समजून घेऊन, बारकाईने विचार करुन मार्ग शोधावा लागेल. घरात संवादाचा अभाव, अतिलाड, भावनिक-मानसिक असुक्षितता, हातात खुळखुळणारा पैसा अशा अनेक कारणांचा विचार करावा लागेल.

- श्रुती पानसे, समुपदेशक

----------------------

कोणत्या वयोगटातील मुले काय कारणाने कोणत्या स्वरुपाचे गुन्हे करत आहेत, त्यांचे राहणीमान या सर्व बाबींची सखोल माहिती समोर आल्याशिवाय निष्कर्ष काढणे अवघड आहे. मुले विघातक दिशेला जाऊ नयेत, यासाठी पालकांचे मुलांवर लक्ष असायला हवे. मुलांचे लाड करण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. मुले जन्मत:च सर्व काही शिकून येत नाहीत. आपण त्यांना काय शिकवतो, कसे वातावरण देतो, अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. पालकांनी आपली जबाबदारी जबाबदारीने पार पाडायला हवी.

- डॉ. भूषण शुक्ला, बालमानसोपचारतज्ज्ञ