शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

भोसरीत गुन्हेगारी वाढली : विलास लांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 14:19 IST

नागरिकांना १५ वर्ष मुलभूत सोयी-सुविधांची कमतरता पडू दिली नाही. विकासकामे करूनही शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले आहे. याचे दु:ख वाटते.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट राष्ट्रवादी काँग्रेसने केला

पिंपरी : भोसरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. लोक याविषयी काही बोलत नाहीत. गप्प बसत आहेत. वाढत्या भाईगिरीमुळे शहराचा बिहार होतो की काय? अशी भीती वाटत आहे. हे वातावरण निर्माण करणाऱ्यांनी असे करणाऱ्यांनी याचा विचार करावा. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही, असा हल्लाबोल भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला. भोसरीतील हल्लाबोलच्या सभेत विलास लांडे यांनी गुन्हेगारीवर भाष्य केले. लांडे म्हणाले,पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. उड्डाणपूल, नाट्यगृहे, प्रशस्त रस्ते, उद्याने राष्ट्रवादीने विकसित केली आहे. १५ वर्ष नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधांची कमतरता पडू दिली नाही. विकासकामे करूनही शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले आहे, याचे दु:ख वाटते. परंतु, शहरवासियांनी ज्यांना सत्ता दिली. त्यांना पालिका नीट चालविता येत नाही.गेल्या चार वर्षात काय काम झाले ही शहरातील जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. गेली चार वर्ष शांत बसलो होतो एक शब्दही बोललो नाही. आता ख-या अर्थाने बोलण्याची वेळ आली आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. दुस-या पक्षात जाणार अशा वावड्या उठविल्या जातात. परंतु, राष्ट्रवादी सोडून अन्य कुठल्याही पक्षात जाणार नाही.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीBJPभाजपा