शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

सोयाबीनची उगवण न झाल्याने कृषिधन कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:29 AM

पुणे : पेरणी केल्यानंतर सोयाबीनच्या बियाणांची उगवणी न झाल्याने संबंधित बियाणे उत्पादक कंपनीच्या मॅनेजरवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

पुणे : पेरणी केल्यानंतर सोयाबीनच्या बियाणांची उगवणी न झाल्याने संबंधित बियाणे उत्पादक कंपनीच्या मॅनेजरवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दगडु नानाभाऊ अंभोरे (रा. शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या कृषिधन कंपनीच्या मॅनेजरचे नाव आहे.

याप्रकरणी जुन्नर तालुका कृषि अधिकारी सतीश कारभारी शिरसाठ (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूकीसह बियाणे कायदा ६ बी, ७ बी सह बियाणे नियम कलम २३ ए/२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ जून ते १ जुलै २०२० दरम्यान घडला होता.

जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामामध्ये कृषिधन प्रा. लि. जालना या कंपनीने सोयाबीन बियाणे (के एस एल ४४१) वाणीची मोठ्या प्रमाणावर विक्री केली होती. मात्र, या बियाणांची उगवणी झाली नाही. त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले. जुन्नर तालुक्यातील कोंबरवाडी, आर्वी, पिंपळगाव, गोळेगाव, बेल्हे या गावातील शिवाजी आहेर, रोहिदास शिंदे, पांडुरंग दाते, अंजनाबाई शिंदे यांच्यासह ३२ शेतकर्यांनी तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रारी केल्या होता. त्याची चौकशी कृषि अधिकारी शिरसाठ यांनी केली. कंपनीकडून विकण्यात आलेली सोयाबीन बियाणे ही १५ ते ३० टक्के निकृष्ट असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर फसवणूक आणि बियाणे कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसाठ यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कृषिधन कंपनीचे मुख्य कार्यालय सेनापती बापट रोडवरील साई कॅपिटल येथे असल्याने हा गुन्हा आळेफाटा पोलिसांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे वर्ग केला आहे.