शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

‘लोकअदालती’त ४६ हजार प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:23 IST

राज्यात झालेल्या लोकअदालतीमध्ये विविध न्यायालयांमधील प्रलंबित; तसेच दाखलपूर्व अशा एकूण ४६ हजार ९८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली

पुणे : राज्यात झालेल्या लोकअदालतीमध्ये विविध न्यायालयांमधील प्रलंबित; तसेच दाखलपूर्व अशा एकूण ४६ हजार ९८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. राज्यातील सर्व न्यायालयांतील ३ लाख ९२,८७३ प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती, त्यापैकी २० हजार १९३ दाखलपूर्व आणि २६, ७९५ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली.राज्यातील सर्वाधिक निकाली काढण्यात आलेली प्रकरणे पुणे जिल्हा न्यायालयातील आहेत. पुण्यातील ८,१५१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापाठोपाठ नागपूरमधील लोकअदालतमध्ये दुसºया क्रमांकाने ७,२७७ प्रकरणे, तर मुंबई लोकअदालतमध्ये राज्यात तिसºया क्रमांकाने ३,००३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपैकी नगरमधील लोकअदालतमध्ये १,२७१, सातारा येथील लोकअदालतमध्ये १,१२० सांगलीमध्ये १,०७३, तर कोल्हापूरमध्ये ७६२ आणि सोलापूरमध्ये ६९१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. मराठवाड्यातील उस्मानाबाद लोकअदालतमध्ये १,४५१, लातूरमध्ये १,०९९, बीडमध्ये २,२९८ तसेच औरंगाबादमध्ये ८९२ औरंगाबाद हायकोर्टमध्ये ३३२,आणि नांदेडमध्ये ८६७ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. परभणीमध्ये २६९ आणि जालना लोकअदालतमध्ये २५६ प्रकरणे निकाली झाली.कोकणातील जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्यामध्ये १,६९७, ठाणे जिल्ह्यात १,६१७, रत्नागिरीमध्ये २९९ आणि सिंधुदूर्गमध्ये १७७ तसेच मुंबई हायकोर्टमध्ये ३४ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात १,५५३, जळगावमध्ये २,१८१ आणि नाशिक लोकअदालतमध्ये २,१४२ तसेच नंदूरबारमध्ये २७२ प्रकरणे निकाली निघाली.प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी व्हावी आणि पक्षकारांना लवकर न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे दरतिमाही लोकअदालतीचा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवायच्या आहेत, त्यांनी स्थानिक न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.1विदर्भातील चंद्रपूरमध्ये २०६, वर्धा जिल्ह्यात ११८, गडचिरोलीमध्ये ७०, तर नागपूर खंडपीठ येथे ३६ आणि अमरावतीमध्ये ४०८ आणि अकोला जिल्ह्यामध्ये १,५५८ आणि यवतमाळमध्ये १,८०२, बुलडाणा येथे १,०३६ आणि भंडारा जिल्ह्यात ६४०, तर गोंदिया लोकअदालतमध्ये ३३० प्रकरणातील पक्षकारांना लोकअदालतमुळे दिलासा मिळाला.2प्रलंबित प्रकरणांमुळे पक्षकारांना न्यायासाठी अनेकवर्षे वाट पाहावी लागते. कोर्टाच्या कामकाजातील प्रक्रियेमुळे त्यांना सातत्याने ’तारीख पे तारीख’ला सामोरे जावे लागते. अशा प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी व्हावी, या उद्देशाने लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. ज्या पक्षकारांची प्रकरणे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली काढता येणे शक्य आहे, त्यांनाच लोकअदालतीमध्ये समाविष्ट करण्यात येते.