शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे देशाच्या सहिष्णुतेला गालबोट : डॉ. शमसुद्दीन तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 20:14 IST

सध्या सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या विकृती बाहेर काढण्याची गरज आहे. सामाजिक सलोखा हा देशाचा मूलभूत आधार आहे.

ठळक मुद्देतीन गरीब विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकार

पुणे : जम्मू येथे एका मुलीचे अपहरण केले जाते,तिच्यावर अत्याचार केले जातात आणि तिला मारले जाते. समाजात घडणाऱ्या याप्रकारच्या सातत्यपूर्ण घटना माणुसकीला पोषक नाही. अशा प्रसंगांमुळे समाजामध्ये दुरावा निर्माण होतानाच देशाच्या सहिष्णुतेला गालबोट लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत माणसाने समोरच्या व्यक्तीचा जात, धर्म न पाहता माणूस म्हणून विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे असे प्रसंग घडू नये यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले. गणेश पेठेतील श्री पोटसुळ्या मारुती मंडळातर्फे तीन गरीब आणि हुशार विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. यावेळी इकबाल दरबार, पोटसुळ्या मारुती मंडळाचे कुणाल पवार, ओंकार जाधव, राजेंद्र मांढरे, समीर तिडके, प्रयाग जाधव, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शहा, अभिषेक मारणे, चेतन शिवले, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला नवले, पर्यवेक्षिका कल्पना कोल्हे, शिक्षक जनार्दन इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमात तायरा शेख, आयशा शेख, आचल कांबळे या विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व मंडळाने स्वीकारले असून मंडळातर्फे साडेचार हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच पुस्तके, वह्या, गणवेश, दप्तर, बूट या शालेय वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. तांबोळी म्हणाले, मुलींवरील अत्याचाराचे दुर्देवी प्रसंग गुजरात आणि उत्तरप्रदेश येथे देखील घडले. या सगळ्या प्रकारामधून समाजात वाढत चाललेली विकृती दिसून येते. सध्या सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या विकृती बाहेर काढण्याची गरज आहे. प्रत्यक्षात सामाजिक सलोखा हा देशाचा मूलभूत आधार आहे.’

  

टॅग्स :Puneपुणे