शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

नारायणगावला तणावपूर्ण वातावरणात मोजणी

By admin | Updated: August 27, 2015 04:44 IST

खेड-सिन्नर बाह्यवळणासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नारायणगाव येथे आज भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मोजणी सुरू करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांनी विरोध केल्याने

नारायणगाव : खेड-सिन्नर बाह्यवळणासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नारायणगाव येथे आज भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मोजणी सुरू करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांनी विरोध केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून १५ जणांना ताब्यात घेतले़ यामुळे वारूळवाडी व नारायणगाव या शहरांत काही काळ तणावाचे वातावरण होते़ कारवाईच्या निषेधार्थ शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला़. काही तरुणांनी रस्त्यावर टायर जाळून संताप व्यक्त केला़ खेड-सिन्नर या राष्ट्रीय राजमार्ग क्ऱ ५० चे चौपदरीकरण सुरू असून, नारायणगाव येथे बाह्यवळण होणार आहे़ या बाह्यवळणाकरिता सुमारे १०० शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी संपादन करण्यासाठी मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी आले असता, सकाळी दहाच्या सुमारास बाधित शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला. शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न जुन्नरचे प्रांताधिकारी कल्याण पांढरे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, तहसीलदार प्रल्हाद हिरामणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग विभागाचे अधिकारी झोडगे यांनी केला. शेतकऱ्यांनी मोजणी करू द्यावी, यासाठी बाधित शेतकऱ्यांची बैठक कुकडी विश्रामगृहात सुमारे २ तास झाली़ मात्र, बाधित शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे म्हणणे मांडले; परंतु जिल्हाधिकारी राव यांनी चर्चा नंतर केली जाईल, आज मोजणीला सुरुवात करा, असा आदेश दिला़ त्या वेळी बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून पुन्हा रास्ता रोको केला. त्याबरोबरच पोलिसांनी बळाचा वापर करून माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, योगेश (बाबू) पाटे, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, महेश शिंदे, समीर मेहेत्रे, आशिष वाजगे, शंकर फुलसुंदर, योगेश वाघचौरे, आत्माराम पाटे, बाळकृष्ण पाटे, मारुती भुमकर, वैभव वाजगे, सनी पाटील आदी ३० ते ४० शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये टाकून नेले़ काही शेतकरी व कार्यकर्त्यांनी पोलिसांची व्हॅन अडविण्याचा प्रयत्न केला़ तर, रस्त्यावर लाकडे टाकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नारायणगाव एसटी बस स्थानकासमोर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला़ त्यामुळे सुमारे दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ या मोजणीला विरोध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी प्रशासनाने मोजणी करण्याकरिता थोडी मुदत द्यावी व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे; अन्यथा भविष्यात याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा या वेळी दिला़ ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना रात्री उशिरा सोडून देण्यात आले. (वार्ताहर)