शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

दंडाचे अधिकार महापालिकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:33 IST

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने समाविष्ट गावांना मिळणार दिलासा

पुणे : अनधिकृत; तसेच वाढीव बांधकामे अधिकृत करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम निश्चित करण्याचे; तसेच त्यातील नियम, अटी शिथिल करण्याचे अधिकार महापालिकांना देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेने समाविष्ट गावांमधील अशा बांधकामांना दिलासा मिळणार आहे. सध्या दंडाची रक्कम बरीच जास्त असल्याने कोणीही यासाठी महापालिकेशी संपर्क साधत नाही.पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली. राज्य सरकारच्याच सूचनेवरून राज्यातील सर्व महापालिकांनी मध्यंतरी अशा बांधकामांना अधिकृत करण्यासाठी म्हणून एक योजना जाहीर केली होती. त्यानुसार ज्यांचे बांधकाम असे आहे त्यांना वास्तुविशारदाकडून महापालिकेकडे ते बांधकाम अधिकृत करण्यासाठी म्हणून प्रस्ताव दाखल करायचा होता. महापालिकेकडून त्याची पाहणी करून त्यांना दंड आकारून ते बांधकाम अधिकृत करून देण्यात येणार होते. यासाठीची दंडाची रक्कम; तसेच अन्य नियम सरकारने तयार केले होते. महापालिकांनी योजनेची अंमलबजावणी करायची होती. पुणे महापालिकेनेही असे प्रस्ताव दाखल करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली होती व त्यानंतर मात्र अशा बांधकामांवर कडक कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते.उपगनगरे; तसेच समाविष्ट गावांमधून किमान काही हजार प्रस्ताव येतील व त्यातून महापालिकेला २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अधिकाºयांचा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र ६ महिन्यांच्या मुदतीत फक्त ७० प्रस्ताव आले व पाहणीनंतर त्यातील फक्त १२ प्रस्तावांमधील बांधकाम अधिकृत करता आले. सरकारने यासाठीचे नियम व अटी दिल्या होत्या. त्यात महापालिकेच्या व राज्य सरकारच्या प्रचलित बांधकाम नियमांच्या अटींची फारशी मोडतोड न करता त्या केवळ काही प्रमाणात कमी करण्यात आल्या होत्या. क्षेत्रफळ, उंची, सुरक्षा यासाठीच्या अटींमध्ये कसलीच तडजोड करण्यात आली नव्हती; तसेच दंडही दुप्पट आकारण्याची तरतूद त्यात होती.या जाचक अटी, नियमांमुळे; तसेच दंडाची रक्कम जास्त होत असल्यानेच या योजनेकडे पाठ फिरवण्यात आली असल्याचे दिसते आहे. थोड्याफार फरकाने सर्वच महापालिकांमध्ये अशी स्थिती आहे. त्यामुळेच सुरुवातीला सरकार या योजनेला मुदतवाढ देण्याच्या विचारात होते; मात्र आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दंडाची रक्कम ठरवण्याचे अधिकार महापालिकांना देण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.न्यायालयाचे सरकारवर ताशेरेराज्य सरकारच्या या योजनेच्या विरोधात काही स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात सरकारच अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी पैसे घेऊ लागले, तर अवैध बांधकामांच्या संख्येत वाढहोईल, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.त्यावर न्यायालयाने सरकारवर ताशेरे मारत अशाधोरणामुळे शहरात अवैध बांधकामे बोकाळतील, अशीभीती व्यक्त केली होती. दंडाची रक्कम; तसेच आराखडा प्रत्यक्ष बांधकाम यातील फरक कसा ओळखायचा, असे विचारले होते.

टॅग्स :Puneपुणे