शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus ; मनाचा मोठेपणा; पुण्यात मेस बंद झाल्यानं विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य डबे घेऊन अवतरली 'अन्नपूर्णा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 18:31 IST

कोरोनाच्या भीतीने रस्त्यात चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला उचलण्यास नागरिक तयार नसल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली होती. मात्र त्याच पुण्यात आता कुठलाही संबंध नसताना केवळ माणुसकी म्हणून विद्यार्थ्यांना विनामूल्य जेवण देत असणारी माऊली समोर आली आहे.

पुणे :कोरोनाच्या भीतीने रस्त्यात चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला उचलण्यास नागरिक तयार नसल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली होती. मात्र त्याच पुण्यात आता कुठलाही संबंध नसताना केवळ माणुसकी म्हणून विद्यार्थ्यांना विनामूल्य जेवण देत असणारी माऊली समोर आली आहे. या व्यक्तीचं नाव आहे विद्या जितेंद्र जोशी. 

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुण्यात झाला असताना तो वाढू नये म्हणून अनेक हॉटेल, खानावळी बंद आहेत. अशावेळी महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि मूळ पुणेकर नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून जोशी कुटुंब पुढे सरसारवले आहे. हेच कुटुंब केवळ माणुसकी म्हणून पुण्यात दाखल असणाऱ्या रुग्णांनाही डबे पुरवते. आता त्या पलीकडे जाऊन कोरोनाच्या संकटात त्यांनी पुन्हा सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

 विद्या या स्वतः महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची मेस काही कारणाने बंद होती. त्याकाळी सांगलीसारख्या ठिकाणी सध्याच्या काळासारखी खूप हॉटेल नव्हती. त्यामुळे त्यांना ऐन परीक्षेत चक्कर आली.  रुग्णालयात दाखल व्हावे लागले आणि त्यांची त्या विषयाची परीक्षा बुडली होती. त्यावेळी आलेला अनुभव त्याच्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला आहे. त्यामुळे कोरोनाचा अप्रादुर्भाव झाल्यावर त्यांनी तात्काळ गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर दिवसरात्र कायदा, सुव्यवस्था राखणारे पोलीस आणि आरोग्य राखण्यासाठी झटणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांनाही त्या कोरडे खाद्य पदार्थ पुरवत आहेत. विद्या यांचा स्वतःचा व्यवसाय असून त्यासंदर्भाने त्या अनेक महिलांसोबत संपर्कात असतात. त्यामुळे त्यांचे स्टेटस बघून अनेक महिलांनी हे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र कोरोनात एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज असल्याने त्यांनी संबंधित महिलांनाही त्यांच्या भागात गरजू विद्यार्थ्यांसाठी अशी मदत केंद्र सुरु करण्याची विनंती केली आहे. 

याबाबत लोकमतशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'डब्यात डाळ, तांदूळ आणि वस्तू साठवून ठेवण्यापेक्षा त्या गरजू व्यक्तींसाठी उपयोगी पडणे अधिक महत्वाचे आहे. शेवटी वस्तू संपण्यासाठी आहेत आणि कोरोनाही आज ना उद्या जाणार आहे मात्र माणुसकी कायमस्वरूपी टिकणार आहे. आपण तोच विचार करायला हवा. शेवटी बाहेरून येणारे विद्यार्थी हे पुणेकरांचे पाहुणे आहेत आणि आपल्यावर त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना मदत करायलाच हवी असे मला वाटते'. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड