शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Coronavirus: रेमडेसिव्हीर कोरोनावर 'रामबाण' नाही, सरसकट वापर नको; तज्ज्ञ डॉक्टरांचे मत

By प्राची कुलकर्णी | Updated: April 10, 2021 15:39 IST

सरसकट वापर टाळण्याचे आवाहन

रेमडेसिव्हीर हा कोरोना वरचा रामबाण उपाय नसून गरज नसताना अनेकांना इंजेक्शन साठी धावपळ करायला लागत असल्याचं मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.‌ रेमडेसिव्हीर हे आजाराच्या शोधात असलेलं इंजेक्शन असून कोरोनावर ते काही अंशीच उपयुक्त ठरत असल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यात सध्या सगळीकडेच रेमडेसिव्हीर चा तुटवडा असलेला पाहायला मिळत आहे. रेमडेसिव्हीर मिळवण्यासाठी लोकांनी अक्षरशः दुकानाबाहेर रांगा लावलेल्या आहेत. यानंतरही अनेकांना गरजे इतके इंजेक्शन्स न घेतात परत जाण्याची वेळ येत आहे. या सगळ्यांमध्ये दुकानांबाहेर गर्दी होऊन तिथे डिस्टन्सिंग चे नियम देखील धाब्यावर बसवले जात आहेत. मात्र रुग्णाचा जीव वाचावा यासाठी धडपडणाऱ्या नातेवाईकांना याची पर्वा न करता तासंतास रांगेत उभे रहावे लागत आहे. 

पण रेमडेसिव्हिर हे औषध हा कोरोना वरचा रामबाण उपाय नाही. तसंच अनेक रुग्णांना ते कारण नसतानाही दिलं जात असल्याचं मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वरिष्ठ सल्लागार, अतिदक्षता, डॉक्टर समीर जोग म्हणाले ," रेमडेसिव्हीर हे खरं तर रोगाच्या शोधात असलेल्या औषध आहे. वेगवेगळ्या साथी जेव्हा आल्या तेव्हा तेव्हा ते वापरून पाहिलं गेलं. कोरोना वर ते काही अंशी परिणाम करत असल्याच सुरूवातीला वाटलं . पण आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन ने अभ्यास करून निष्कर्ष काढला की रेमडेसिव्हिर हे लाईफ सेविंग ड्रग नाही.या इंजेक्शन मुळे होतं काय तर त्यात लक्षणांची तीव्रता कमी होते. कोणतेही औषध हे चाचण्यांवर उतरलेलं औषध नाही. अभ्यासाने हे सिद्ध झालंय की मोर्टलिटी वर रेमडेसिव्हिर चा काहीच परिणाम नाही. त्याने होत काय तर फक्त लक्षणांची तीव्रता कमी होते. मात्र हल्ली डॉक्टर पेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिव्हीरचा आग्रह धरला जात आहे." 

राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे म्हणाले," रेमडेसिव्हीर चार वापर मध्यम स्वरूपच्या इन्फेक्शन मध्ये होतो.सौम्य रुग्णांमध्ये ते वापरलं जात नाही. मध्यम स्वरूपच्या निमोनिया मध्ये त्याचा वापर होतो. ते योग्य वेळी वापरणे आवश्यक आहे. रुग्ण गंभीर झाल्यावर मात्र त्याचा वापर करून फायदा नसतो. मात्र सध्या रुग्णांना जास्त त्रास होऊ नये म्हणून काही प्रमाणात डॉक्टर रेमडेसिव्हिर वापरताना दिसतायेत. आणि गरज पडली तर असावे म्हणून नातेवाईक ही रिमडेसिव्हिर चा साठा करत आहेत. यामागे अर्थातच भीती आहे."

डॉक्टर विजय नटराजन सीईओ सिंबायोसिस रुग्णालय म्हणाले ," रेमडेसिव्हीर चा वापर सरसकट होतो आहे. यामुळे गरजूंना त्याची आवश्यकता भासत आहे. लोक लागू शकेल म्हणून खरेदी करून ठेवत आहे. त्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. H1N1चा वेळी जसा औषधांवर निर्बंध घातले होते तसे निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे. टास्क फोर्स ने हे औषध कधी द्यायचा याचा गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या डॉक्टरांनी पाळणे आणि पेशंट नी डॉक्टराना निर्णय घेऊ देणं गरजेचं आहे."

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकdoctorडॉक्टर