शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Coronavirus : पुण्यातील एनआयव्हीमध्ये ‘कोरोना’वर होते अंतिम शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 06:50 IST

काळजी घ्या, विलगीकरण महत्त्वाचे, शास्त्रज्ञ बाबासाहेब तांदळे यांचे आवाहन

राजानंद मोरे/राहूल गायकवाड पुणे : ‘देशभरातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना नमुन्यांची तपासणी होत असली तरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) केले जात आहे. या संस्थेतील शास्त्रज्ञांकडून संबंधित नमुन्यांची पुन्हा तपासणी केली जात आहे. तसेच निगेटिव्ह आलेल्या नमुन्यांमधील सुमारे १० टक्के नमुन्यांची तपासणीही पुन्हा ‘एनआयव्ही’मध्ये होत आहे. तसेच सध्या दररोज ५० ते ६० नमुन्यांची तपासणी केली जात आहे. ही क्षमता २०० ते ३०० पर्यंत वाढू शकते,’ अशी माहिती ‘एनआयव्ही’तील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब तांदळे यांनी दिली.‘कोरोना’विषयीच्या विविध मुद्यांवर तांदळे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, विमानतळावर तपासणी झाल्यानंतर संबंधित प्रवाशामध्ये काही लक्षणे असतील तर त्याला विलगीकरण कक्षात दाखल केले जाते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही रुग्णालयात दाखल केले जाते. त्यांचे नमुने ‘एनआयव्ही’सह अन्य अधिकृत प्रयोगशाळांमध्ये पाठविले जातात. सध्या ५० हून प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांची तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासणी याठिकाणी होते. एखादा नमुना पॉझिटिव्ह आला तर ते नमुने पुन्हा ‘एनआयव्ही’मध्ये येतात. तिथे तपासणी झाल्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब केले जाते. तसेच निगेटिव्ह नमुन्यांपैकी किमान १० टक्के नमुन्यांची पुन्हा एनआयव्हीमध्ये तपासणी होते. यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यादृष्टीने दक्षता घेतली जाते.एनआयव्हीमध्ये दररोज २०० ते ३०० नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे. आमच्याकडे सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ प्रशिक्षित आहेत. सध्या अन्य प्रयोगशाळांमध्येही तपासणी वाढल्याने एनआयव्हीमध्ये केवळ जवळपासचे किंवा पॉझिटिव्ह आलेले नमुने पुन्हा तपासणीसाठी येत आहेत. इटली, इराण अन्य काही देशांमधून घेण्यात आलेल्या नमुन्यांचे प्रमाण काहीसे अधिक आहे. दैनंदिन तपासणीसाठी ८ ते १० शास्त्रज्ञ असून जवळपास ३० तंत्रज्ञही असल्याचे तांदळे यांनी नमूद केले.\बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनाही विलग करणे आवश्यक आहे. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, हे टाळणे आवश्यक आहे. लागण झालेल्या व्यक्तीशी संपर्क आला नसेल तर कुणीही घाबरू नये. दैनंदिन काळजी घेतल्यास कोणताही संसर्ग होणार नाही.- डॉ. बाबासाहेब तांदळे,वरिष्ठ शास्त्रज्ञ, एनआयव्ही रुग्णालयातून पळालेला रुग्ण परतलाकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भोसरी येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील एका रुग्णाsने पलायन केले होते, मात्र, त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.भोसरी येथील एका रुग्णाने शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयातून पलायन केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासन व पोलिसांची धावपळ झाली. पोलिसांनी रुग्णाला ताब्यात घेतले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ससून रुग्णालयाला तातडीने ५ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोनाPuneपुणे