शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहरात " लक्षणविरहित रुग्णांच्या " निष्काळजीपणामुळे वाढतोय कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 13:24 IST

असे रुग्ण बाहेर फिरल्याने संसर्ग वाढल्याचा अंदाज

ठळक मुद्दे" लक्षणविरहित आणि गृहविलगीकरणात असलेल्यांनी काळजी घ्या ", वैद्यकीय तज्ञांचे आवाहन

लक्षणविरहित रुग्णांना त्रास कमी असला तरी त्यांच्या माध्यमातून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी कोणाचाही संपर्कात येवू नये. लक्षणविरहित रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञनी सांगितले. 

फेब्रुवारी पासून सुरू झालेली रुग्ण वाढ ही आता उच्चांक गाठत आहे. रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत.  सुरुवातीला रुग्ण वाढ होत असताना लक्षणविरहित रुग्णांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे बहुतांश रुग्णांनी गृहविलगीकरणात उपचार घेणे पसंत केले. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी कोणाच्याही संपर्कात न येता विलग राहणे बंधनकारक आहे. अशा रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे आणि यातील काही रुग्ण बाहेर फिरल्यामुळे संसर्ग वाढला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

डॉक्टरांनी सांगितले की, फेब्रुवारी पासून सुरू झालेली ही रुग्ण वाढ साधारण मे पर्यँत राहू शकते. अनेक रुग्णांनी लवकर उपचार घेतले नाहीत. दुखण अंगावर काढल, वेळेत तपासणी करून घेतली नाही. सौम्य लक्षण आहेत म्हणून अनेकांनी दुर्लक्ष केले. यामुळे सध्या रुग्ण वाढ आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचा अंदाज आहे. लक्षणविरहित रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने पूवी सारखे स्थिती येणार नाही. असा अंदाज सुरूवातीला व्यक्त केला जात होता. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात मागील चार दिवसात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

लक्षणविरहित आणि  गृहवीलगिकरणात असलेल्यानी ही काळजी घ्या 

- कोणाच्याही संपर्कात येवू नका. - विशेषतः घरातील लहान मूल आणि ज्येष्ठ नागरिकांपासून दूर राहा.  - बरे होई पर्यँत वेगळ्या स्वछतागृहाचा वापर करा- घरात राहणे शक्य नसल्यास कोविड सेंटरला दाखल होणे गरजेचे आहे. - सौम्य लक्षण असले तरीही रक्ताच्या तपासण्या, ईसीजी, एक्सरे आदी तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या.   - स्वतः चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर घरातील सर्वांच्या तपासण्या करून घ्या.  वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील सांगितले की, रुग्णांनी दुखणं अंगावर काढू नये. वेळेत उपचार केले तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. गंभीर रुग्णांना वेळेत प्लाझ्मा आणि रेमडीसीव्हर दिल्यास बरे होण्यास मदत होते. मागील काही दिवसांपासून लक्षणविरहित रुग्णांबरोबरच गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. वेळेत तपासणी करणे आवश्यक आहे. लक्षणविरहित रुग्ण आणि गृहविलगीकरणात असलेल्यांनी काळजी घ्यावी. त्यांच्यामुळे इतरांना त्रास होवू शकतो. ताप आल्यास किंवा कोणताही त्रास झाल्यास स्वतःच्या मनाने गोळ्या, औषध घेवू नये.    

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या