शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकावरून वाद पेटला; राजीनामासत्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 16:17 IST

साेशल मीडियावरील टीव- टीव एवढी महत्त्वाची कशी? काेबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादिका अनघा लेले यांचा सवाल...

पुणे : तज्ज्ञांच्या समितीच्या अभ्यासपूर्ण मतांपेक्षा ज्यांनी पुस्तकाचे पानही उघडून पाहण्याची तसदी घेतलेली नाही अशांनी ट्विटरवर फेकलेल्या मतांना जास्त किंमत कशासाठी, असा सवाल कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा अनुवाद केलेल्या अनघा लेले यांनी व्यक्त केली.

लेले म्हणाल्या की, एक व्यावसायिक भाषांतरकार म्हणून हा पुरस्कार मिळणे ही मोठी गोष्ट होती. तो जाहीर झाला तेव्हा अनुवाद चांगला जमलाय याची पावती मला मिळाली, असे वाटले हाेते. पुरस्कार रद्द झाला आणि वेगळेच सत्य समाेर आले. त्या पुस्तकात एवढा गदारोळ करण्यासारखे खरेच काही आहे का? ते न पाहताच ट्विटरवरून केलेला गदारोळच जास्त महत्त्वाचा मानला जावा, ही दुर्दैवी बाब आहे.

दरम्यान, शासनाने हा पुरस्कार तडकाफडकी रद्द केल्याच्या निषेधार्थ ‘वैचारिक घुसळण’चे लेखक आनंद करंदीकर व ‘भुरा’चे लेखक शरद बाविस्कर यांनी शासनाचा पुरस्कार नाकारत असल्याचे जाहीर केले. काही लेखकांनीही शासनाच्या या कृतीबद्दल नाराजी दर्शविली. तसेच राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे डॉ. प्रज्ञा दया पवार आणि कवयित्री नीरजा यांनी पत्राद्वारे शासनाला कळविले आहे. परीक्षक हेरंब कुलकर्णी यांनीही शासनाच्या या कृतीचा निषेध केला आहे.

१) अनुवादक अनघा म्हणाल्या... :

राज्य शासनाने हा पुरस्कार तडकाफडकी रद्द केल्याचे समजताच लेले यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेचा विषय ठरली. लेले यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे की, जे मूळ पुस्तक तीन वर्षांपासून शांतपणे मेनस्ट्रीम बाजारात ऑनलाइन- ऑफलाइन उपलब्ध आहे. दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत, चार- पाच भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. अनेक ठिकाणी परीक्षणे, लेखकाच्या मुलाखती छापून आल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करीत ट्विटरवरून केलेला गदारोळच जास्त महत्त्वाचा मानला जावा, ही बाब दुर्दैवी आहे. मात्र, अनेक वाचकांनी पुस्तक वाचून आवर्जून मेसेज पाठवून अनुवादाचे कौतुक केलेय तेही माझ्यासाठी तितकेच मोलाचे आहे.

२) शरद बाविस्कर म्हणाले... :

राज्य शासनाचा पुरस्कार नाकारताना शरद बाविस्कर यांनी म्हटले आहे की, ज्या हुकूमशाही पद्धतीने सरकारने हे केले आहे ते लेखक, अनुवादक यांची निश्चितच अप्रतिष्ठा करणारे आहे. यातून सत्तेचा दर्प आणि लेखक- अनुवादकांना कवडीमोल समजणारी हीन फॅसिस्ट वृत्ती दिसून येते. अशा विधायक गोष्टींवर लोकशाहीचा तिरस्कार करणारी फासीवादी मंडळी कुरघोडी करत असतील तर माझ्या समोर मोठा नैतिक प्रश्न उपस्थित होतो. शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा. जो लेखक-अनुवादकांचा अवमान केला आहे. तज्ज्ञांच्या निवड समितीचा अवमान केला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी. तरी आजच्या घडीला महाराष्ट्रात ज्या फासीवादी पद्धतीने पुरस्कार रद्द केला गेला त्याचा विचार केल्यावर वाटते की हा पुरस्कार नाकारणे हीच सम्यक भूमिका ठरेल आणि तो माझ्या सद्सद्विवेकबुद्धीचा आवाजदेखील आहे.

३) लेखक आनंद करंदीकर म्हणाले... :

पुस्तकाला आधी पुरस्कार देगे; मग नाकारणे. यातून पुस्तक काहीतरी वाईट आहे, असे जाहीर करत आहेत. कोबाड गांधी यांच्या विचाराशी मी देखील काहीवेळा सहमत नाही. विचारांशी सहमत नसाल तर वाद घाला, तुमची मते प्रसिद्ध करा; पण ज्याचा अनुवाद केला. तुमच्या समितीनेच त्याची निवड केली. त्यानंतर शासकीय अधिकारात आम्ही तो नाकारतो, हा निर्लज्जपणा आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. हेच करायचं तर मग पुस्तकावर बंदी आणा ना. त्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. उद्या म्हणाल की, आमचा गांधी यांच्या पुस्तकांना विरोध आहे. त्यांना प्रसिद्धीच देणार नाही, असे कसे चालेल. शासनाची कृती मला आवडली नाही. नुसता मी निषेध केला असता तर लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिले नसते. म्हणून पुरस्कार नाकारला आहे.

४) राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्य डॉ. प्रज्ञा दया पवार म्हणाल्या... :

मुळात शासनाने आधी घोषित केलेला पुरस्कार रद्द करणे आणि तज्ज्ञांची समिती बरखास्त करणे हे लोकशाही प्रक्रियेला धरून नाही. मूळ मुद्दा हा आहे की लेखकाच्या पुस्तकावर बंदी घातलेली नाही. त्याच्या आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मग कशाच्या आधारे पुरस्कार रद्द करण्यात आला. दुसरं म्हणजे राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यांनाही विश्वासात घेतलेले नाही. यातून शासनाची हुकूमशाही मानसिकता दिसून येत आहे. त्यामुळे शासनाला विनंती करावीशी वाटते की त्यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा.

५) लेखक संजय साेनवणी म्हणाले.... :

संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. विचासरणी कुठलीही असो, कुणीही लेखन करावं, प्रकाशन करावे, अनुवाद करावे, पुस्तक विकावे त्यावर कुणीही प्रतिवाद किंवा विरोध करू शकत नाही. राज्य सरकार कोणत्याही विचारसरणीचे असले तरी ते सर्वांचे असते. ते असा भेदभाव करू शकत नाही. हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक व अघटनात्मक आहे. हा पुरस्कार अनुवादासाठी आहे. तो किती उत्कृष्ट केलाय त्याला हा पुरस्कार आहे. हा अनुवादिकेवरही अन्याय आहे. यातच निवड समिती बरखास्त करणे म्हणजे समितीच्या स्वातंत्र्यावर बंधन घालणारे आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड