शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना हाच धर्म

By admin | Updated: November 28, 2015 00:36 IST

‘काही मंडळी स्वार्थासाठी धर्म, जातीच्या नावाखाली समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा धर्मापासून दूर राहणेच मला आवडते.

पुणे : ‘काही मंडळी स्वार्थासाठी धर्म, जातीच्या नावाखाली समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा धर्मापासून दूर राहणेच मला आवडते. मात्र, एखाद्या दरिद्री माणसाला मदत हवी असेल, तर त्याला पुरवणे हाच मी धर्म मानतो. प्रत्येकाने आपले कर्तव्य हाच धर्म समजला पाहिजे. धर्म ही गोष्ट उंब-याच्या आतच ठेवायला हवी. एकदाउंबरठा ओलांडला की भारतीय राज्यघटना हाच आपला धर्म मानला पाहिजे’,असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत २० व्या ज्ञानेश्वर-तुकारामस्मृती व्याख्यानमालेतील तिस-या दिवशीच्या प्रबोधन कार्यशाळेत डॉ. जब्बार पटेल‘मनाचे व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, माईर्स एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, स्कूल आॅफ टेलिकॉमचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे व प्रा. गौतम बापट आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘प्रत्येक कैदी हा गुन्हेगार नसतो. कैद्यांनाही त्यांच्याकडून नकळत घडलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो. पूर्वनियोजित गुन्ह्यांची संख्या फार कमी असते. अनेकदा गुन्हे हे भावनेच्या आहारी गेल्यानेच घडतात. त्याची शिक्षा मात्र दीर्घकाळ भोगावी लागते. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून मनाचे व्यवस्थापन करणे उपयुक्त ठरते’, डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, हिंसेचा जन्ममनात होतो. त्यानंतर ती कृतीत उतरते. मनावर नियंत्रण ठेवणे अतिशय कठिण आहे, असे गीतेमध्ये अजुर्नाने म्हटले आहे. त्यावर उत्तर देताना श्रीकृष्णाने म्हटले आहे, की अभ्यासाने व वैराग्याने हे साध्य करता येते. त्यासाठी आपण सर्वांनी विषयाकडे ओढ घेणारी आपली इंद्रिये आवरुन धरली, तर या जगात विश्वशांती नांदल्याशिवाय राहणार नाही.प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ. संजय उपाध्ये यांनी आपले मनोगत व्यक्त केली. डॉ. मिलिंद पांडे यांनी स्वागत केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन, डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)