शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

राज्यघटना हाच धर्म

By admin | Updated: November 28, 2015 00:36 IST

‘काही मंडळी स्वार्थासाठी धर्म, जातीच्या नावाखाली समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा धर्मापासून दूर राहणेच मला आवडते.

पुणे : ‘काही मंडळी स्वार्थासाठी धर्म, जातीच्या नावाखाली समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा धर्मापासून दूर राहणेच मला आवडते. मात्र, एखाद्या दरिद्री माणसाला मदत हवी असेल, तर त्याला पुरवणे हाच मी धर्म मानतो. प्रत्येकाने आपले कर्तव्य हाच धर्म समजला पाहिजे. धर्म ही गोष्ट उंब-याच्या आतच ठेवायला हवी. एकदाउंबरठा ओलांडला की भारतीय राज्यघटना हाच आपला धर्म मानला पाहिजे’,असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत २० व्या ज्ञानेश्वर-तुकारामस्मृती व्याख्यानमालेतील तिस-या दिवशीच्या प्रबोधन कार्यशाळेत डॉ. जब्बार पटेल‘मनाचे व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, माईर्स एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, स्कूल आॅफ टेलिकॉमचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे व प्रा. गौतम बापट आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘प्रत्येक कैदी हा गुन्हेगार नसतो. कैद्यांनाही त्यांच्याकडून नकळत घडलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो. पूर्वनियोजित गुन्ह्यांची संख्या फार कमी असते. अनेकदा गुन्हे हे भावनेच्या आहारी गेल्यानेच घडतात. त्याची शिक्षा मात्र दीर्घकाळ भोगावी लागते. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून मनाचे व्यवस्थापन करणे उपयुक्त ठरते’, डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, हिंसेचा जन्ममनात होतो. त्यानंतर ती कृतीत उतरते. मनावर नियंत्रण ठेवणे अतिशय कठिण आहे, असे गीतेमध्ये अजुर्नाने म्हटले आहे. त्यावर उत्तर देताना श्रीकृष्णाने म्हटले आहे, की अभ्यासाने व वैराग्याने हे साध्य करता येते. त्यासाठी आपण सर्वांनी विषयाकडे ओढ घेणारी आपली इंद्रिये आवरुन धरली, तर या जगात विश्वशांती नांदल्याशिवाय राहणार नाही.प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ. संजय उपाध्ये यांनी आपले मनोगत व्यक्त केली. डॉ. मिलिंद पांडे यांनी स्वागत केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन, डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)