शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

प्रत्येक धर्मासाठी संविधानच धर्मग्रंथ : शमशुद्दीन तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 15:53 IST

देशात संविधान हे सर्वोच्च असल्याने भारतातील सर्व धर्मियांसाठी हाच धर्मग्रंथच असला पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी मांडले.

ठळक मुद्दे‘भारतीय संविधान आणि मुस्लीम महिलांचे प्रश्न’ या विषयावर मार्गदर्शन तांबोळी यांचे मार्गदर्शनधर्मातील जाचक रुढींविरुद्ध लढण्यासाठी पीडित महिलांनीच एकत्र यावे : तांबोळी

पुणे : देशात संविधान हे सर्वोच्च असल्याने भारतातील सर्व धर्मियांसाठी हाच धर्मग्रंथच असला पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय संविधान आणि मुस्लीम महिलांचे प्रश्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. विद्यागौरी टिळक, सीएमईचे प्रशासन अधिकारी महादेव कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. टिळक यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.डॉ. तांबोळी म्हणाले, की तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांचे प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर आले असताना हे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय संविधानातील तरतुदींचा आधार घेणे आवश्यक आहे. धर्मग्रंथातील रूढींचा धर्मवादी संघटनांकडून गैरवापर करून महिलांचे आणखी खच्चीकरण केले जात आहे. सरकारही विधेयकाच्या रूपाने सुधारणा करण्याचे आश्वासन देत असले तरी शरियतच्या नावाखाली सुरु असलेल्या रुढींच्या उच्चाटनासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. आत्ताच्या ट्रिपल तलाक विधेयकाबाबतही सरकारची अशीच भूमिका आहे. धर्मातील या जाचक रुढींविरुद्ध लढण्यासाठी पीडित महिलांनीच एकत्र यावे.समाजातील विविध घडामोडीचे ज्ञान आणि त्यावर विद्यार्थ्यांनी विचारमंथन करावे यासाठी विभागाकडून  व्याख्यानमालांचे आयोजन केले जाते. अशा व्याख्यानातून प्रत्यक्ष काम करणाऱ्या  कार्यकर्त्याशी थेट संवाद साधता येतो, असे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. तांबोळी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकानिरसन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामबाबू घुले व सागर सुरवसे यांनी केले तर प्रास्ताविक कपिल कांबळे यांनी केले.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकPune universityपुणे विद्यापीठPuneपुणे