शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र सुरूच : ओम प्रकाश कोहली; पुणे विद्यापीठात ‘ज्ञानसंगम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 15:41 IST

बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्ञानसंगम चर्चासत्रदेश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी शिक्षण अजूनही पारतंत्र्यातच : ओम प्रकाश कोहली

पुणे : बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. शिक्षणाशी जोडली गेलेली संस्कृती व परंपरेची नाळ तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे. देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी शिक्षण मात्र अजूनही पारतंत्र्यातच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली. शिक्षणाचे भारतीयकरण करण्याचे आव्हान स्वीकारून त्यादृष्टीने दिशा निश्चित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित ‘ज्ञानसंगम’ या दोन दिवसीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष प्रा. अनिरूध्द देशपांडे, मंचचे प्रांत संयोजक हरिभाऊ बिरासदार, संयोजक प्रा. आनंद लेले, जे. नंदकुमार व्यासपीठावर उपस्थित होते. ‘भारतीय शैक्षणिक परंपरेमध्ये राष्ट्रबोध आणि वर्तमान संदर्भ’ हा या चर्चासत्राचा विषय आहे. कोहली म्हणाले, मुस्लिम राजवटी सुमारे हजार वर्षांच्या काळात देशातील लोकांनी केवळ राजकीय पराभव स्वीकारला होता. पण केवळ केवळ १९० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीमध्ये लोकांनी राजकीय पराभवाबरोबरच मानसिक पराभवही स्वीकारला. देशाला ७० वर्ष स्वातंत्र्य मिळूनही आपण या मानसिक पराभवातून बाहेर पडलो नाही. महात्मा गांधी यांची पुर्ण स्वराज्याची कल्पना आज दिसत नाही. ‘स्व’ म्हणजे आपली परंपरा ज्या राज्यामध्ये प्रतिबिंबित होते ते ‘स्वराज्य’ त्यांना अपेक्षित होते. त्यासाठी शिक्षणाला आपली संस्कृती व परंपरेशी जोडण्याची गरज आहे. हे करत असताना ते कालानुरूप असायला हवे. आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्यासही हे शिक्षण सक्षम असावे. युरोपीय शिक्षणामुळे हिनता बोध निर्माण झाला. मुल्यांचा र्‍हास होण्याबरोबरच आपण परंपरेपासून वेगळे झालो.भारत हा सर्वसमावेशक देश आहे. हा देश सर्वांना सोबत घेवून पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो. देशाची संस्कृती आणि परंपरेतच हे मुळ आहे. पाश्चिमात्य देशांसारखा संकुचित नाही. मात्र, अद्याप आपण राष्ट्राची दिशा, राष्ट्रदर्शन निश्चित करू शकलो नाही, असे मत डॉ. कृष्ण गोपाळ यांनी व्यक्त केले. डॉ. करमळकर यांनी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सर्वांना समान शिक्षण देणे हे देशासमोरील आव्हान असल्याचे सांगितले. बिरासदार यांनी प्रास्ताविक केले. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठeducationशैक्षणिकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ