शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र सुरूच : ओम प्रकाश कोहली; पुणे विद्यापीठात ‘ज्ञानसंगम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 15:41 IST

बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्ञानसंगम चर्चासत्रदेश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी शिक्षण अजूनही पारतंत्र्यातच : ओम प्रकाश कोहली

पुणे : बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. शिक्षणाशी जोडली गेलेली संस्कृती व परंपरेची नाळ तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे. देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी शिक्षण मात्र अजूनही पारतंत्र्यातच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली. शिक्षणाचे भारतीयकरण करण्याचे आव्हान स्वीकारून त्यादृष्टीने दिशा निश्चित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित ‘ज्ञानसंगम’ या दोन दिवसीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष प्रा. अनिरूध्द देशपांडे, मंचचे प्रांत संयोजक हरिभाऊ बिरासदार, संयोजक प्रा. आनंद लेले, जे. नंदकुमार व्यासपीठावर उपस्थित होते. ‘भारतीय शैक्षणिक परंपरेमध्ये राष्ट्रबोध आणि वर्तमान संदर्भ’ हा या चर्चासत्राचा विषय आहे. कोहली म्हणाले, मुस्लिम राजवटी सुमारे हजार वर्षांच्या काळात देशातील लोकांनी केवळ राजकीय पराभव स्वीकारला होता. पण केवळ केवळ १९० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीमध्ये लोकांनी राजकीय पराभवाबरोबरच मानसिक पराभवही स्वीकारला. देशाला ७० वर्ष स्वातंत्र्य मिळूनही आपण या मानसिक पराभवातून बाहेर पडलो नाही. महात्मा गांधी यांची पुर्ण स्वराज्याची कल्पना आज दिसत नाही. ‘स्व’ म्हणजे आपली परंपरा ज्या राज्यामध्ये प्रतिबिंबित होते ते ‘स्वराज्य’ त्यांना अपेक्षित होते. त्यासाठी शिक्षणाला आपली संस्कृती व परंपरेशी जोडण्याची गरज आहे. हे करत असताना ते कालानुरूप असायला हवे. आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्यासही हे शिक्षण सक्षम असावे. युरोपीय शिक्षणामुळे हिनता बोध निर्माण झाला. मुल्यांचा र्‍हास होण्याबरोबरच आपण परंपरेपासून वेगळे झालो.भारत हा सर्वसमावेशक देश आहे. हा देश सर्वांना सोबत घेवून पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो. देशाची संस्कृती आणि परंपरेतच हे मुळ आहे. पाश्चिमात्य देशांसारखा संकुचित नाही. मात्र, अद्याप आपण राष्ट्राची दिशा, राष्ट्रदर्शन निश्चित करू शकलो नाही, असे मत डॉ. कृष्ण गोपाळ यांनी व्यक्त केले. डॉ. करमळकर यांनी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सर्वांना समान शिक्षण देणे हे देशासमोरील आव्हान असल्याचे सांगितले. बिरासदार यांनी प्रास्ताविक केले. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठeducationशैक्षणिकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ