शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

बदलीसाठी आमचाही विचार करा, पती-पत्नी शिक्षकांचे गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:01 IST

निमशासकीय जोडीदाराचाही समावेश : एकत्रीकरणासाठी शिक्षक पती-पत्नींचे गाऱ्हाणे

नीरा : शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, पती पत्नी एकत्रीकरण करण्याच्या संवर्ग दोन मध्ये ग्रामविकास विभागाने शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असणारा जोडीदारच विचारात घेतल्याने परजिल्ह्यात कामावर असणाऱ्या हजारो शिक्षकांना बदलीपासून वंचित राहावे लागणार आहे.

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत संवर्ग दोन मध्ये पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत पती किंवा पत्नीच्या जवळच्या तीस किलोमीटर अंतरावर जोडीदाराला नियुक्ती मिळते. सरकारच्या या धोरणामुळे खरे तर अनेक गुरुजींचे संसार वाचले मात्र हे पुण्य केवळ शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असलेल्या गुरुजनांनाच मिळाले. खासगी कंपनी, पतसंस्था, धमार्दाय संस्थांतील संचालक, कार्यवाहक, ग्रंथपाल यांसाहित अनेक इतर ठिकाणी काम करत असलेल्या जोडीदाराला अपात्र ठरविण्यात आल्याने हजारो गुरुजी या बदली प्रक्रियेपासून वंचित राहिले. तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक या पदांसाठी उच्च पदवीधर ते पीएचडी धारक अर्ज करत आहेत. त्यातही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद आहे तर टीइटी च्या फार्समध्ये अनेक भावी गुरुजी अडकून बसले. पैकी अनेकांनी आज ना उद्या काळ बदलेल अशी भूमिका ठेवत डीएड पदविकाधारक जोडीदाराशी लग्न केले. मात्र, नंतरच्या काळात नोकरीची आशा धूसर झाल्यावर अनेकांनी मिळेल तेथे नोकरी स्वीकारली. पैकी अनेकांनी खासगी लेखापाल, कंपनी, पतसंस्था यात नोकरी स्वीकारली तर काहींनी धमार्दाय संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत स्वीकारत शिक्षणासाठी काम सुरू केले. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी निश्चित केलेल्या धोरणात संवर्ग दोन मध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, नगरपालिका, निमशासकीय, केंद्र सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी तसेच शासन मान्यताप्राप्त संस्थेतील कर्मचारी म्हणून दोघांपैकी एकजण सेवेत असल्यास त्यांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून संबोधण्यात आले आहे.

एकीकडे कुणी नोकरी देता का नोकरी? अशी परिस्थिती असताना दोघांपैकी एकजण खासगी कंपनी किंवा कार्यालयात काम करणाया शिक्षकांवर एकप्रकारे अन्याय झाल्याचे मत व्यक्त होत आहे. सध्या राज्यात अनेक शिक्षक स्वगृहापासून शेकडो किमी अंतरावर आपले कर्तव्य बजावत आहेत.

सरळ मार्गाने बदली फॉर्म भरताना प्रचंड संख्येमुळे अर्थातच बदलीचा नंबर लागण्याची शक्यता मुळातच कमी असते. त्यातच जिल्हाअंतर्गत बदलीसाठी शेजारील जिल्ह्याच्या नजीकच्या तालुक्यात बदली होण्यासाठी १० वर्षे सेवेची अट घालण्यात आली आहे.

त्यामुळे वर्षानुवर्षे असे अनेक गुरुजी व बाई त्यांचा जोडीदार कामावर असतानाही बदली प्रक्रियेला मुकत आहेत त्यामुळे शासनाने याचा विचार करून धोरणात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकPuneपुणे