शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

नैसर्गिक जलस्रोताचे संवर्धन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 07:05 IST

जागा आरक्षित करण्याची मागणी; बावधनमध्ये होणार जलपूजन

पाषाण : माणसांना नद्यांशी जोडा आणि ओढ्यांना हृदयाशी, हे ब्रीद घेऊन बावधन परिसरात नदी पात्रातील नैसर्गिक प्रवाह पुनरुज्जीवन करण्यात येत आहेत. त्यामुळे एक नवी जलचळवळ उभी राहत आहे. नैसर्गिक जलस्रोतांवर आरक्षण टाकून ते संरक्षित करावेत, अशी मागणी जलप्रेमींनी केली आहे.पुणे शहरातील बावधन परिसरातून राम नदी वाहते. एकेकाळी शुद्ध, सदानीरा असणारी राम नदी आता मरणासन्न अवस्थेत आहे. तिला पुन्हा जिवंत करायचे असेल तर तिचे संरक्षक कवच असणारे ओढे-नाले जिवंत केले पाहिजेत आणि झरे कायमस्वरूपी सुरक्षित केले पाहिजेत. असाच एक जिवंत झरा आणि बावधन ओढाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी सामान्य माणसाला जिवंत झऱ्याशी जोडू या मोहीम सुरू करण्यात आली.बावधनमधील ओढ्यातील भर उन्हाळ्यात आजसुद्धा प्रतिदिन १ लाख लिटर आणि वर्षाला साडेतीन कोटी लिटर पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध जिवंत झºयातून मिळत आहे. त्यामुळे त्याचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करण्यासाठी मागील वर्षभर प्रयत्न करण्यात आले असून या पाण्याच्या प्रवाहांना शासनाने आरक्षित करावे व त्यांना ऐतिहासिक ठेव्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. बावधन गावात नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेल्या जलस्रोताचे अतिक्रमण व प्रदूषणापासून संरक्षण व संवर्धन करण्यासाठी या बाबतीत गेल्या वर्षांपासून पुणे महानगरपालिका आयुक्त व महापौर, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय संचालक, केंद्रीय भूजल मंडळ, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्याशी ईमेल तसेच पत्राद्वारे संपर्क साधला आहे, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकाराने उत्तर आलेले नाही, असे जलप्रेमींनी सांगितले. यावर्षी जलपूजन करून पुन्हा बावधनमधील सर्व नागरिक मिळून असा स्वच्छ जिवंत पाण्याचा झरा बंद होण्यापासून व प्रदूषणापासून सुरक्षित करण्यासाठी स्थानिक नगरसेवक व शासनाला आवाहन करणार आहेत.रामनदी जलकलश पूजन उद्यागेल्या वर्षी जलमंदिर कल्पना साकारून या झºयाचे पूजन करण्यात आले. नदी पात्रातील झरे शोधून नागरी सहभागातून स्वच्छ करण्यात येत आहेत. २२ एप्रिल रोजी रामनदी जलकलश पूजा करून हा हजारो नागरिकांची तहान भागवेल अशा स्वच्छ जिवंत पाण्याचा झरा बंद होण्यापासून व प्रदूषणापासून सुरक्षित करण्याचा प्रयत्न नगरसेवक, गावकरी, विविध संस्थांनी केला आहे.जलस्रोत बंद होऊ नये म्हणून केलेल्या मागण्या...जलस्रोताच्या आसपासची जागा संगनमताने आरक्षित करणे गरजेचे आहे.जिवंत तीन स्रोत वाचवण्यासाठीचे अनुभवी जल तज्ज्ञ, भूगर्भशास्त्र तज्ज्ञांची कमिटीच्या सल्ल्यानुसार काम केले तर हा जल स्रोत नक्कीच पिढ्यान्पिढ्या स्वच्छ पाणी देत राहील. तीन हजार नागरिक या पाण्याचा वापर करतात. ते याच पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्याचे संवर्धन होणेआवश्यक आहे. शासन स्तरावर ओढे व झरे यांचा रामनदी प्रश्नावर अभ्यास करणे गरजेचे आहे.नैसर्गिक ‘जलदेवता’ मंदिर संकल्पनानिसर्गाच्या कुशीत आकाशातून पडलेला पावसाचा थेंब वाहून जाऊ नये किंवा त्याचे बाष्पीकरण होऊ नये म्हणून धरणीमातेने आपल्या उदरामध्ये जपून ठेवला. त्यानंतर संपूर्ण वर्षभर १२० ते १४० लिटर प्रतिमिनिट म्हणजेच जवळजवळ एक लाख लिटर प्रतिदिन या जलस्रोतातून पाणी मिळते. हे पाणी टेस्टिंग करून पिण्यालायक आहे, याची खात्री करून घेतली आहे. अशा नैसर्गिकरित्या जलप्रदान करणाºया ‘नैसर्गिक जलदेवता मंदिरांचे’ संरक्षण करणे गरजेचे आहे, असे जलप्रेमींनी सांगितले. जलदेवता मंदिर म्हणजे झरा होय.

टॅग्स :Waterपाणी