शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

अतिजोरदार पावसाच्या दिवसांत होतेय वाढ, १०० वर्षांच्या अभ्यासातून निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 5:40 AM

पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये होतो़ पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची वाढ होत असतानाच हलका व मध्यम पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये घट होत

विवेक भुसेपुणे : पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये होतो़ पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची वाढ होत असतानाच हलका व मध्यम पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये घट होत असून जोरदार आणि अतिजोरदार पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये वाढ होत आहे़ पावसाने सरासरी गाठली तरी, शेतीला ते नुकसानकारक व भूजलपातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होत नसल्याचे अभ्यासात दिसून आले आहे़डॉ़ पी़ गुहाठाकुर्ता आणि एलिझाबेथ साजी यांनी महाराष्ट्रातील शंभर वर्षांतील पावसाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे़पावसाची प्रामुख्याने कोरडे दिवस, हलका पाऊस, मध्यम, जोरदार आणि अति जोरदार पाऊस अशी वर्गवारी केली जाते़ त्यात हलका आणि मध्यम पाऊस म्हणजे ६० मिमीपर्यंतचा पडलेला पाऊस गृहीत धरला जातो़ या पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले़ ६० ते १२० मिमी पाऊस पडला तर त्याला जोरदार पाऊस म्हटले जाते़ यामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही़ १२० मिमीपेक्षा अधिक पडलेल्या पावसाला अतिजोरदार पाऊस म्हटले जाते़ कोकण किनारपट्टी भागात अशा अतिजोरदार पावसाचे प्रमाण जास्त आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अशा अति जोरदार पावसाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे़ आता आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न उभा राहिला आहे़ धरण व आपत्ती व्यवस्थापन यांनी या निष्कर्षाचा उपयोग करुन नियोजन केल्यास हानी टाळण्यास मदत होऊ शकते, असेही डॉ़ गुहाठाकुर्ता यांनी सांगितले़गेल्या शंभर वर्षांत...पाऊसमान वाढलेले जिल्हे : अहमदनगर, अकोला, अमरावती, मुंबई शहर, मुंबई उपनगर, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ.पाऊसमान कमी झालेले जिल्हे : औरंगाबाद, बीड, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, रायगड, वर्धा़