शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उद्या काँग्रेसची मुंबईत उच्चस्तरीय बैठक : राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत होणार निर्णय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 18:52 IST

उद्या काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक मुंबईत होत असून यात निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यात इतर प्रश्नांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते चर्चेला घेतले जाण्याची शक्यता आहे 

पुणे : उद्या काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक मुंबईत होत असून यात निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यात इतर प्रश्नांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते चर्चेला घेतले जाण्याची शक्यता आहे 

राज्यात गतवैभव परत आणण्यासाठी काँग्रेस चांगलीच कामाला लागली असून दिल्लीतील वरिष्ठ नेते आणि राज्यातील नेते यांची महत्वपूर्ण बैठक उद्या मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत पुणे लोकसभा जागेचा उमेदवारही घोषित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील काँग्रेसचे मतदारसंघ आणि मुद्दे यावर बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय प्रचार यंत्रणा आणि आघाडीशी निगडीत मुद्देही बैठकीत सोडवले जाण्याची चिन्हे आहेत. 

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ सुजय विखे हे भाजपतर्फे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या भाजपप्रवेशानंतरही विखे यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र विखे हे सुजय यांचा प्रचार करत असल्याची चर्चा आहे. शिवाय विखे हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असताना त्यांनी नगरमध्ये प्रचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष काय निर्णय घेणार आहे का याबाबतचा प्रश्न पुण्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, 'मी आत्ता यावर काहीही भाष्य करणार नाही. विखे यांच्या विषयी असे काही प्रश्न असतील तर त्याची चर्चा उद्याच्या बैठकीत होईल. 

पुरोगामी व्यक्तींच्या हत्येच्या तपासावरून मुख्यमंत्र्यांवर टीका 

डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावरून उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावल्याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, या तीनही हत्यांच्या तपासात राज्य आणि केंद्र सरकारची अत्यंत गलथानपणाची भूमिका आहे. विशिष्ट वर्गाला मदत करण्याची मदत करण्याची भूमिका आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हे जनतेला वेगळं सांगायची गरज नाही.  त्यावर शिक्कामोर्तब उच्च न्यायालयाने केले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसPoliticsराजकारण