शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्या काँग्रेसची मुंबईत उच्चस्तरीय बैठक : राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत होणार निर्णय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 18:52 IST

उद्या काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक मुंबईत होत असून यात निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यात इतर प्रश्नांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते चर्चेला घेतले जाण्याची शक्यता आहे 

पुणे : उद्या काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक मुंबईत होत असून यात निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यात इतर प्रश्नांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते चर्चेला घेतले जाण्याची शक्यता आहे 

राज्यात गतवैभव परत आणण्यासाठी काँग्रेस चांगलीच कामाला लागली असून दिल्लीतील वरिष्ठ नेते आणि राज्यातील नेते यांची महत्वपूर्ण बैठक उद्या मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत पुणे लोकसभा जागेचा उमेदवारही घोषित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील काँग्रेसचे मतदारसंघ आणि मुद्दे यावर बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय प्रचार यंत्रणा आणि आघाडीशी निगडीत मुद्देही बैठकीत सोडवले जाण्याची चिन्हे आहेत. 

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ सुजय विखे हे भाजपतर्फे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या भाजपप्रवेशानंतरही विखे यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र विखे हे सुजय यांचा प्रचार करत असल्याची चर्चा आहे. शिवाय विखे हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असताना त्यांनी नगरमध्ये प्रचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष काय निर्णय घेणार आहे का याबाबतचा प्रश्न पुण्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, 'मी आत्ता यावर काहीही भाष्य करणार नाही. विखे यांच्या विषयी असे काही प्रश्न असतील तर त्याची चर्चा उद्याच्या बैठकीत होईल. 

पुरोगामी व्यक्तींच्या हत्येच्या तपासावरून मुख्यमंत्र्यांवर टीका 

डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावरून उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावल्याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, या तीनही हत्यांच्या तपासात राज्य आणि केंद्र सरकारची अत्यंत गलथानपणाची भूमिका आहे. विशिष्ट वर्गाला मदत करण्याची मदत करण्याची भूमिका आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हे जनतेला वेगळं सांगायची गरज नाही.  त्यावर शिक्कामोर्तब उच्च न्यायालयाने केले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसPoliticsराजकारण