शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
3
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
4
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
5
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
6
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
7
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
8
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
9
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
10
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
11
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
12
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
14
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
15
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
16
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; एक तरुण आला आणि...
17
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
18
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
19
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
20
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

पुण्यात काँग्रेस गटबाजीचे ग्रहण कायम : राजीव गांधी जयंतीमध्येही वेगवेगळी चूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 21:25 IST

सन २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे शहरातील नेते डोळे उघडायला तयार नाहीत. राजीव गांधी जयंतीनिमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार चुली मांडून पक्षातील गटबाजी कायम असल्याचेच दाखवून दिले गेले. Congress facing groupism in Pune

पुणे : सन २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे शहरातील नेते डोळे उघडायला तयार नाहीत. राजीव गांधी जयंतीनिमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार चुली मांडून पक्षातील गटबाजी कायम असल्याचेच दाखवून दिले गेले. पक्षाची संघटना शक्तीहिन झाली असून नव्या कार्यकर्त्यांचा पक्षाकडे येण्याचा ओघही थांबला आहे. नेते निवांत व कार्यकर्ते त्यांच्या पेक्षाही निवांत असे चित्र निर्माण झाले आहे.संपुर्ण शहरावर राजकीय वर्चस्व असलेला काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षात शहरात मोडकळीस आला आहे. लोकसभेच्या निवडणूकीत कसेबसे बळ एकवटून उभ्या राहिलेल्या पक्षाला सव्वा तीन लाखपेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला. तरी अजूनही पक्षाचे नेते एकत्रितपणे काही करण्याऐवजी स्वतंत्रपणे आपापल्या भागात पक्षाच्या नावे कार्यक्रम घेत आहे. त्यांच्यापैकी कोणीही दुसºयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. अन्य ठिकाणी कार्यक्रम केले ते काँग्रेस भवनात फिरकले नाहीत. त्यामुळे चार कार्यक्रम होऊनही पक्षाचे नाव मात्र कुठेच झाले नाही. परिणामी काँग्रेस भवन ओस व प्रभागही ओस अशी काँग्रेसची अवस्था झाली.काँग्रेसचे अजून कशातच काही नाही असेच चित्र आहे. विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत, मात्र त्यांना संघटनेच्या कामात रस नाही, दोन्ही आमदार बहुसंख्यवेळा मुंबईतच असतात.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण तसेच अन्य काही नेत्यांवर पुणे शहराची जबाबदारी दिली आहे. मात्र त्यांनी पुण्यात लक्ष घातल्याचे दिसलेले नाही.प्रदेशाध्यक्षपदी नवी नियुक्ती झाल्यानंतरही पुण्यातील पक्षाच्या स्थितीत फरक पडलेला नाही. पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांचे प्रमाण कमी झाले आहे. महापालिकेत पक्षाचे फक्त ९ नगरसेवक आहेत. त्यांच्याकडून पक्षवाढीचे काही घडताना दिसत नाही. युवक, महिला, मागासवर्गीय, कामगार अशा पक्षाच्या सर्वच आघाड्यांमध्येही अशीच स्थिती असल्याचे दिसते. पक्षाचे तळातील कार्यकर्तेही आता अगदी उघडपणे भाजपासमोर आपला टिकाव लागणार का असा प्रश्न विचारू लागले आहेत. काँग्रेस टिकणार नाही असा विचार करून नव्याने पक्षाकडे येणाºया युवा कार्यकर्त्यांचा ओघही आता कमी झाल्याचे पक्षाचे वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारीच खासगीत सांगत असतात.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधी