शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुण्यात काँग्रेस गटबाजीचे ग्रहण कायम : राजीव गांधी जयंतीमध्येही वेगवेगळी चूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 21:25 IST

सन २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे शहरातील नेते डोळे उघडायला तयार नाहीत. राजीव गांधी जयंतीनिमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार चुली मांडून पक्षातील गटबाजी कायम असल्याचेच दाखवून दिले गेले. Congress facing groupism in Pune

पुणे : सन २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे शहरातील नेते डोळे उघडायला तयार नाहीत. राजीव गांधी जयंतीनिमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार चुली मांडून पक्षातील गटबाजी कायम असल्याचेच दाखवून दिले गेले. पक्षाची संघटना शक्तीहिन झाली असून नव्या कार्यकर्त्यांचा पक्षाकडे येण्याचा ओघही थांबला आहे. नेते निवांत व कार्यकर्ते त्यांच्या पेक्षाही निवांत असे चित्र निर्माण झाले आहे.संपुर्ण शहरावर राजकीय वर्चस्व असलेला काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षात शहरात मोडकळीस आला आहे. लोकसभेच्या निवडणूकीत कसेबसे बळ एकवटून उभ्या राहिलेल्या पक्षाला सव्वा तीन लाखपेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला. तरी अजूनही पक्षाचे नेते एकत्रितपणे काही करण्याऐवजी स्वतंत्रपणे आपापल्या भागात पक्षाच्या नावे कार्यक्रम घेत आहे. त्यांच्यापैकी कोणीही दुसºयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. अन्य ठिकाणी कार्यक्रम केले ते काँग्रेस भवनात फिरकले नाहीत. त्यामुळे चार कार्यक्रम होऊनही पक्षाचे नाव मात्र कुठेच झाले नाही. परिणामी काँग्रेस भवन ओस व प्रभागही ओस अशी काँग्रेसची अवस्था झाली.काँग्रेसचे अजून कशातच काही नाही असेच चित्र आहे. विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत, मात्र त्यांना संघटनेच्या कामात रस नाही, दोन्ही आमदार बहुसंख्यवेळा मुंबईतच असतात.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण तसेच अन्य काही नेत्यांवर पुणे शहराची जबाबदारी दिली आहे. मात्र त्यांनी पुण्यात लक्ष घातल्याचे दिसलेले नाही.प्रदेशाध्यक्षपदी नवी नियुक्ती झाल्यानंतरही पुण्यातील पक्षाच्या स्थितीत फरक पडलेला नाही. पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांचे प्रमाण कमी झाले आहे. महापालिकेत पक्षाचे फक्त ९ नगरसेवक आहेत. त्यांच्याकडून पक्षवाढीचे काही घडताना दिसत नाही. युवक, महिला, मागासवर्गीय, कामगार अशा पक्षाच्या सर्वच आघाड्यांमध्येही अशीच स्थिती असल्याचे दिसते. पक्षाचे तळातील कार्यकर्तेही आता अगदी उघडपणे भाजपासमोर आपला टिकाव लागणार का असा प्रश्न विचारू लागले आहेत. काँग्रेस टिकणार नाही असा विचार करून नव्याने पक्षाकडे येणाºया युवा कार्यकर्त्यांचा ओघही आता कमी झाल्याचे पक्षाचे वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारीच खासगीत सांगत असतात.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधी