शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

भीमा-पाटसच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

By admin | Updated: October 1, 2016 03:35 IST

गेल्या १० महिन्यांपासून पगार न दिल्याने सुरू असलेल्या कामगारांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेली भीमा सहकारी साखर कारखान्यांची ३४वी सर्वसाधारण सभा

पाटस : गेल्या १० महिन्यांपासून पगार न दिल्याने सुरू असलेल्या कामगारांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेली भीमा सहकारी साखर कारखान्यांची ३४वी सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. एकीकडे विरोधकांनी कोंडीत पकडले असताना कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अध्यक्ष चांगलेच कोंडीत सापडले होते. विशेष म्हणजे, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारीच अनुपस्थित राहिले होते.सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी, कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे; सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यावर सभासद संतप्त झाले. अरविंद गायकवाड यांनी, ‘कारखान्याच्या जोरावर ज्यांनी आर्थिक पुंज्या भरल्या त्यांनीच हे कर्ज फेडावे.’ सरपंच मनोज फडतरे यांनी, ‘सभासदाला किती पैसे दिले, हे सांगावे आणि नंतरच कोणी किती ऊस घातला, यावर बोलावे. उगाचच कुणाचे समर्थन करू नका,’ असे म्हणताच सभेत वादंग झाले. त्यानंतर एक ७२ वर्षांचे वयोवृद्ध सभासदांचे प्रश्न मांडत असताना त्यांच्या भाषणात व्यत्यय आणून गोंधळ झाला. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर यांनी कारखाना व्यवस्थापनाने भाड्याने लोक आणले आहेत का? असा आरोप केल्याने एकच गदारोळ झाला. दिवेकर यांनी माफी मागावी, या मागणीने जोर धरला. त्यानंतर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे म्हणाले, ‘‘तुमच्या अडचणी ऐकायच्या किती दिवस? कामगारांचे पगार थकले यासाठी त्यांनी मुंडण केले, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.’’ (वार्ताहर)निषेधसभापरिस्थिती पाहता काही सभासदांनी राष्ट्रगीताला सुरुवात केली. त्यामुळे सभा झाली असल्याचे सत्ताधाऱ्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे, विरोधकांनी या घटनेचा निषेध करून दुसरी निषेध सभा आहे त्याच ठिकाणी घेतली. ...आणि कामगार संतापलेकामगारांनी एकजूट दाखवून काळ्या फिती लावल्या. ते एका बाजूला बसले होते; परंतु सभा अर्ध्यावरच संपल्यानंतर दुसरी निषेध सभा सुरू झाली. या वेळी सत्ताधारी मंडळींच्या काही समर्थकांनी माईक बंद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माईक बंद करणाऱ्यांवर कामगार संतापले होते. आमदार आणि कामगारांत कलगीतुराकारखान्याचे अध्यक्ष आमदार राहूल कुल यांनी कारखान्याची आर्थिक अडचण समजून घ्या, असे पुन्हा आवाहन केले असता, कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत वाबळे भरसभेत उठून म्हणाले, की कामगारांनी मुंडण केले. त्यांना काही वेड लागले नाही. भीक मागायची वेळ आली आहे. आंदोलन करण्यासाठी आम्ही मूर्ख नाही. यावर कुल यांनी वैयक्तिक बोलू नका, असे खडसावले. त्यामुळे कुल व कामगारांत चांगलाच कलगीतुरा रंगला होता.सभा गुंडाळली नाही.कारखान्याच्या हितासाठी ३ तास समर्थपणे सर्व प्रश्नांना उत्तरे देत होतो. सभासद उठले आणि सभा संपली. तेव्हा ‘सभा गुंडाळली’ या म्हणण्यात तथ्य नाही. याउलट, कारखाना संकटातून बाहेर कसा निघेल, यावर काही मंडळींकडून सकारत्मक चर्चेची अपेक्षा होती; मात्र तशी चर्चा झाली नाही.- राहुल कुल, अध्यक्ष भीमा-पाटस कारखाना