शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चौपदरीकरणाचा संभ्रम

By admin | Updated: June 18, 2015 23:38 IST

निगडी ते देहूरोड रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपूल उभारण्याबाबत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मांडण्यात

किवळे : निगडी ते देहूरोड रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपूल उभारण्याबाबत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेली भूमिका व आंदोलकांना दिलेल्या लेखी पत्रात रस्ते विकास महामंडळाने मांडलेली भूमिका यात तफावत आहे. उड्डाणपूल व चौपदरीकरणाच्या कामाबाबत दर वेळी वेगळी माहिती मिळत असल्याने कामाबाबत संभ्रम निर्माण होत असून, काम नक्की कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम १० वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत १५ दिवसांपूर्वी देहूरोड ठाण्यात मावळचे आमदार संजय भेगडे, रस्ते विकास महामंडळाचे सर्व संबंधित अधिकारी, सल्लागार, रस्त्याचे ठेकेदार, आयआरबीचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, संबंधित पोलीस अधिकारी व नागरिक यांची संयुक्त बैठक झाली होती. बैठकीत बोलताना रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते शिळ फाटा दरम्यान विविध ठिकाणी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यावर कामाचे आदेश देण्यात येणार आहेत. देहूरोड ते निगडी दरम्यानच्या सहा किलोमीटर कामासाठी व देहूरोड येथील लोहमार्ग ते गुरुद्वारापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, दोन्ही कामांसाठी एकूण ४१.५४ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे,’ असे स्पष्ट केले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय दरम्यान उड्डाणपूल बांधण्यास दिरंगाई होत चालली आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ व शासन यांच्या निषेधार्थ मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी आत्मदहन आंदोलन करण्याचे रीतसर पत्र दिले. त्यानंतर ह्यमरारविमह्णने मंचाला दिलेल्या लेखी पत्रातील उत्तराने चौपदरीकरणाबाबत व उड्डाणपूल बांधकामाचे काम सुरू होण्याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण असून, सदर पत्रानुसार निगडी ते देहूरोड मार्गाचे चौपदरीकरण करण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीबाबत व कामाच्या आदेशाबाबतचा काहीही उल्लेख केला नसून, निविदेबाबत कार्यवाही सुरू असून, सदर कार्यवाहीनंतर कामे सुरू होणार असल्याचे नमूद केले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र दिले असून, काही अवधी आवश्यक असल्याचे लेखी दिले आहे. महामंडळाकडून दरवेळी वेगवेगळी भूमिका मांडण्यात येत असल्याने देहूरोडच्या नागरिकांत कामाच्या प्रारंभाबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून, उड्डाणपूल व चौपदरीकरण काम कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)