शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

दीड लाखाव्यतिरिक्त थकीत रक्कम कशी भरावी?, शेतकरी कर्जमाफीच्या पात्रता निकषांबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 00:17 IST

छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे.

उरुळी कांचन : छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. या योजनेत थकबाकी भरून कर्जमाफीस पात्र ठरण्यास शेतकºयांकडे काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. मात्र, या योजनेत कुटुंबातील किती खातेदारांना पात्र ठरविले जाणार, याची योग्य माहिती कोणताही अधिकारी उपलब्ध करून देत नसल्याने शेतकºयांच्या मनात थकीत रक्कम भरण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला दीड लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा सुरुवातीचा अध्यादेश काढला होता. कालांतराने कर्जमाफीची व्याप्ती वाढवून १ एप्रिल २००१ पासून ते ३१ मार्च २००८, १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६, १ जून २०१६ व त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत टप्प्याटप्प्याने कर्जाची माहिती मागविली आहे.दरम्यान थकीत असलेल्या शेतकºयांना दीड लाख व कर्ज मुदतीत परतफेड करणाºयांना २५ हजार प्रोत्साहन अनुदान या निकषानुसार लाभार्थी पात्र ठरविले आहेत. नंतर कौटुंबिक मर्यादा व्याप्ती आणखी वाढवून पती व पत्नीच्या नावे दीड लाख रुपये थकीत कर्ज असल्यास, अशा कुटुंबीयांना लाभ देण्याचा निर्णय झाला होता.त्यानुसार लाभार्थ्यालादीड लाखावरील थकीत कर्ज भरण्यासाठी शासनाने तिसºयांदा मुदतवाढ दिली, ती ३० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र, राज्य सरकारने सुधारित अध्यादेश काढला. त्यानुसार जिल्हा बँका, सहकारी सोसायट्या, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका या वित्तीय संस्थांकडून अध्यादेशात किमान कुटुंबातील किती व्यक्तींना योजनेत लाभार्थी करण्यात येईल, याची स्पष्ट माहिती संबंधित संस्थांच्या अधिकाºयांकडून मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. कर्जमाफीसाठी कर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येऊन ठेपल्याने कर्जमाफी हुकते की काय, या भीतीने शेतकरीवर्गधास्तावला आहे.पती, पत्नी व अल्पवयीन मुलेच पात्र : कटकेया संदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) अनंत कटके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने ठरविलेल्या निकषानुसार एका कुटुंबाला लाभ मिळण्यासाठी पती, पत्नी व दोन अल्पवयीन (१८ वर्षांखालील) मुले यांच्यासाठी कर्जमाफीचा नियम ग्राह्य धरण्यात आला आहे.कुटुंबातील एक व्यक्ती, पत्नीव्यतिरिक्त इतर सज्ञान व्यक्ती असल्यास ते कौटुंबिक नियमाच्या अंतर्गत येणार नाहीत. कर्जमाफीची थकबाकी भरणा करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३० सप्टेंबरपर्र्यंत मुदतीत लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.अधिकाºयांकडून केवळ थकीत रकमेची माहिती देणे अथवा खात्यावरील रक्कम भरून घेणे याव्यतिरिक्त अधिक माहिती मिळत नसल्याने या कर्ज खात्यावरील दीड लाख रुपये माफ होतील की नाही, याबाबत शेतकरी आज तरी अनभिज्ञ आहे.ही मुदत ३० सप्टेंबरला संपत असल्याने शेतकºयांनी रक्कम भरण्यासाठी हेलपाटे घालण्यास सुरुवात केली आहे. परंतु, कुटुंबातील किती व्यक्तींंना कर्जमाफीचा लाभ होईल, याची अधिकृत माहिती नसल्याने तो द्विधावस्थेत सापडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnewsबातम्या