शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भविष्यात आंबेडकर जयंती साजरी होईल की नाही याची काळजी :तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:45 IST

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी देशातील स्थिती बघता भविष्यात आंबेडकर जयंती साजरी करू की नाही ही चिंता असल्याचे मत आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

ठळक मुद्देलोकशाहीच्या सद्यस्थितीबाबत पुण्यात व्यक्त केली नाराजी तुषार गांधी महात्मा गांधी यांचे पणतू

पुणे :सध्या लोकशाही व्यवस्था,न्यायालये खिळखिळी करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही ,की नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ ,याची काळजी आहे . पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल की नाही याचीही चिंता वाटत आहे, असे स्पष्ट मत महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी केले.अशावेळी विघटनवादी विचारांवर मात करण्यासाठी सर्व समविचारी व्यक्ती ,संस्थांनी एकत्र येऊन क्रांतीचा लढा  दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुण्यातील क्रांतीज्योती 'संस्था आयोजित ''वैचारिक भीमजयंती ' कार्यक्रमात  ते बोलत होते . यावेळी अन्वर राजन ,डॉ सिद्धार्थ धेंडे , वैशाली चांदणे,डॉ. अमोल देवळेकर ,उमेश चव्हाण,विठ्ठल गायकवाड  व्यासपीठावर उपस्थितहोते.

ज्या शक्तींनी बापूना मारले आणि बाबासाहेबांना बाजूला केले ,सध्या त्याच  शक्ती आंबेडकरांच्या नावात आतापर्यंत नसलेला राम जोडत आहेत .त्यांच्या मनातील डाव ओळखून त्यावर मात केली पाहिजे .बापूंचा राष्ट्रविचार आणि बाबासाहेबांच्या संविधान विचाराला याच शक्ती चूड लावू पाहत आहेत ,असेही ते म्हणाले .गांधी म्हणाले ,'जात ,धर्म ,प्रदेश ,लिंग अशा विघटनवादी घटकांमध्ये आपण विभागले गेलो आहोत . अशातच गांधी विचार आणि आंबेडकरवादी विचार वेगळे असल्याची आवई उठवली जाते . त्यात तथ्य नाही . दोघांच्या डोळ्यासमोर या राष्ट्राच्या कल्याणाचा आणि सामान्य जनतेच्या पुनरुत्थानाच्या विचार होता. बापू आणि बाबासाहेब यांच्या विचारात वैमनस्य  नाही  ,दोघांच्याडोळ्यासमोर मागास जनतेच्या पुनरुत्थानाचाच विचार होता ,दोघांच्यात वैमनस्य असते तर संविधानाच्या निर्मितीसाठी महात्मा गांधींनीबाबासाहेबांची निवड केली नसती आणि बाबासाहेबांच्या मनात द्वेष असता तरगांधींच्या प्रस्तावाचा स्वीकार केला नसता  असा विचार त्यांनी मांडला. 

 

टॅग्स :PuneपुणेDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती