शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भविष्यात आंबेडकर जयंती साजरी होईल की नाही याची काळजी :तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:45 IST

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी देशातील स्थिती बघता भविष्यात आंबेडकर जयंती साजरी करू की नाही ही चिंता असल्याचे मत आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

ठळक मुद्देलोकशाहीच्या सद्यस्थितीबाबत पुण्यात व्यक्त केली नाराजी तुषार गांधी महात्मा गांधी यांचे पणतू

पुणे :सध्या लोकशाही व्यवस्था,न्यायालये खिळखिळी करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही ,की नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ ,याची काळजी आहे . पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल की नाही याचीही चिंता वाटत आहे, असे स्पष्ट मत महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी केले.अशावेळी विघटनवादी विचारांवर मात करण्यासाठी सर्व समविचारी व्यक्ती ,संस्थांनी एकत्र येऊन क्रांतीचा लढा  दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुण्यातील क्रांतीज्योती 'संस्था आयोजित ''वैचारिक भीमजयंती ' कार्यक्रमात  ते बोलत होते . यावेळी अन्वर राजन ,डॉ सिद्धार्थ धेंडे , वैशाली चांदणे,डॉ. अमोल देवळेकर ,उमेश चव्हाण,विठ्ठल गायकवाड  व्यासपीठावर उपस्थितहोते.

ज्या शक्तींनी बापूना मारले आणि बाबासाहेबांना बाजूला केले ,सध्या त्याच  शक्ती आंबेडकरांच्या नावात आतापर्यंत नसलेला राम जोडत आहेत .त्यांच्या मनातील डाव ओळखून त्यावर मात केली पाहिजे .बापूंचा राष्ट्रविचार आणि बाबासाहेबांच्या संविधान विचाराला याच शक्ती चूड लावू पाहत आहेत ,असेही ते म्हणाले .गांधी म्हणाले ,'जात ,धर्म ,प्रदेश ,लिंग अशा विघटनवादी घटकांमध्ये आपण विभागले गेलो आहोत . अशातच गांधी विचार आणि आंबेडकरवादी विचार वेगळे असल्याची आवई उठवली जाते . त्यात तथ्य नाही . दोघांच्या डोळ्यासमोर या राष्ट्राच्या कल्याणाचा आणि सामान्य जनतेच्या पुनरुत्थानाच्या विचार होता. बापू आणि बाबासाहेब यांच्या विचारात वैमनस्य  नाही  ,दोघांच्याडोळ्यासमोर मागास जनतेच्या पुनरुत्थानाचाच विचार होता ,दोघांच्यात वैमनस्य असते तर संविधानाच्या निर्मितीसाठी महात्मा गांधींनीबाबासाहेबांची निवड केली नसती आणि बाबासाहेबांच्या मनात द्वेष असता तरगांधींच्या प्रस्तावाचा स्वीकार केला नसता  असा विचार त्यांनी मांडला. 

 

टॅग्स :PuneपुणेDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती