शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात आंबेडकर जयंती साजरी होईल की नाही याची काळजी :तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:45 IST

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी देशातील स्थिती बघता भविष्यात आंबेडकर जयंती साजरी करू की नाही ही चिंता असल्याचे मत आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

ठळक मुद्देलोकशाहीच्या सद्यस्थितीबाबत पुण्यात व्यक्त केली नाराजी तुषार गांधी महात्मा गांधी यांचे पणतू

पुणे :सध्या लोकशाही व्यवस्था,न्यायालये खिळखिळी करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही ,की नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ ,याची काळजी आहे . पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल की नाही याचीही चिंता वाटत आहे, असे स्पष्ट मत महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी केले.अशावेळी विघटनवादी विचारांवर मात करण्यासाठी सर्व समविचारी व्यक्ती ,संस्थांनी एकत्र येऊन क्रांतीचा लढा  दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुण्यातील क्रांतीज्योती 'संस्था आयोजित ''वैचारिक भीमजयंती ' कार्यक्रमात  ते बोलत होते . यावेळी अन्वर राजन ,डॉ सिद्धार्थ धेंडे , वैशाली चांदणे,डॉ. अमोल देवळेकर ,उमेश चव्हाण,विठ्ठल गायकवाड  व्यासपीठावर उपस्थितहोते.

ज्या शक्तींनी बापूना मारले आणि बाबासाहेबांना बाजूला केले ,सध्या त्याच  शक्ती आंबेडकरांच्या नावात आतापर्यंत नसलेला राम जोडत आहेत .त्यांच्या मनातील डाव ओळखून त्यावर मात केली पाहिजे .बापूंचा राष्ट्रविचार आणि बाबासाहेबांच्या संविधान विचाराला याच शक्ती चूड लावू पाहत आहेत ,असेही ते म्हणाले .गांधी म्हणाले ,'जात ,धर्म ,प्रदेश ,लिंग अशा विघटनवादी घटकांमध्ये आपण विभागले गेलो आहोत . अशातच गांधी विचार आणि आंबेडकरवादी विचार वेगळे असल्याची आवई उठवली जाते . त्यात तथ्य नाही . दोघांच्या डोळ्यासमोर या राष्ट्राच्या कल्याणाचा आणि सामान्य जनतेच्या पुनरुत्थानाच्या विचार होता. बापू आणि बाबासाहेब यांच्या विचारात वैमनस्य  नाही  ,दोघांच्याडोळ्यासमोर मागास जनतेच्या पुनरुत्थानाचाच विचार होता ,दोघांच्यात वैमनस्य असते तर संविधानाच्या निर्मितीसाठी महात्मा गांधींनीबाबासाहेबांची निवड केली नसती आणि बाबासाहेबांच्या मनात द्वेष असता तरगांधींच्या प्रस्तावाचा स्वीकार केला नसता  असा विचार त्यांनी मांडला. 

 

टॅग्स :PuneपुणेDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती