शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

केंद्र सरकारने कामगार कायदा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा : कामगार संघटना कृती समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 14:00 IST

कामगार कायदा मोडीत काढण्याचा उद्योग रद्द करा..

ठळक मुद्देकामगारांची रोजगार सुरक्षा नष्ट होणार

पिंपरी : केंद्र सरकारने विरोधकांच्या अनुपस्थितीत कामगार कायदे रद्द करून उद्योगपतींना अनुकूल कायदे संमत केले आहेत. त्यामुळे कामगारांची रोजगार सुरक्षा नष्ट होणार असून, कायम कामगार संकल्पना मोडीत निघणार असल्याचा दावा कामगार संघटना कृती समितीने केला आहे. 

लोकसभेत २२ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीत कामगार कायदे रद्द केले. त्यामुळे कोणत्याही कारणाशिवाय कामगारांना कामावरून कमी करण्याचा अधिकार उद्योगांना मिळणार आहे. पूर्व परवानगी शिवाय तीनशे कामगार संख्या असलेल्या उद्योगाला कामगार कपात करण्यास अथवा कंपनी बंद करण्याचा अधिकार मिळणार आहे. सरकारने कंत्राटी कामगार कायदा रद्द केल्याचे दिसत आहे. ठराविक कालावधीसाठी कामगार नेमणूक करण्याची प्रथा सार्वत्रिक करून कायम कामगार संकल्पना नष्ट केली जाईल.

कामगार कायदे केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त विषय असतानाही केंद्र सरकारने राज्यांना विचारात न घेताच कायद्यात बदल केले आहेत. कामगार कायदा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करू नये, लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना दहा हजार रुपयांचे अनुदान द्यावे,  लॉकडाऊन काळातील वेतन पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सिटू पुणेचे अजित अभ्यंकर, श्रमिक एकता संघाचे दिलीप पवार, वसंत पवार यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. कामगार संघटना कृती समितीने मागण्यांचे निवेदन कामगार उपयुक्तांना नुकतेच दिले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEmployeeकर्मचारीLabourकामगारCentral Governmentकेंद्र सरकार