शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभिप्रायासाठी पालिका कर्मचाऱ्यांना अरे‘रावी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 21:20 IST

स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळेनासा झाल्यामुळे महापालिकेने ऑनलाईन अभिप्राय नोंदविण्यासाठी आपल्याच १७ हजार कर्मचाऱ्यांमागे दंडूका उगारला आहे.

पुणे : स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळेनासा झाल्यामुळे महापालिकेने ऑनलाईन अभिप्राय नोंदविण्यासाठी आपल्याच १७ हजार कर्मचाऱ्यांमागे दंडूका उगारला आहे. हा अभिप्राय नोंदविणे बंधनकारक करण्यात आले असून अभिप्राय न नोंदविल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत.            याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेमध्ये यंदा पहिल्या क्रमांकाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी आसुसलेले आहेत. त्यासाठी वारंवार नागरिकांना आवाहन केले जात आहे. मात्र, सध्या शहरातील  ‘स्वच्छते’ची अवस्था, अतिक्रमणे, रस्त्यांची अवस्था, जागोजाग सुरु असलेली कामे, धूळ यामुळे नागरिकांनी या सर्वेक्षणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नागरिकांचा अपेक्षित सहभाग मिळत नसल्याने अधिकाधिक गुण कसे मिळणार असा प्रश्न प्रशासनाला पडलेला आहे. त्यामुळे हक्काच्या १७ हजार कर्मचा स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभिप्रायासाठी पालिक कर्मचाऱ्यांना अरे‘रावी’ना ऑनलाईन अभिप्राय नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.            राहण्यायोग्य शहरांच्या यादीमध्ये देश पातळीवर अग्रगण्य ठरलेल्या पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात मात्र उत्तम कामगिरी करता आलेली नाही. स्पर्धेच्या निकषानुसार, शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सकारात्मक अभिप्राय नोंदविणे गरजेचे आहे. परंतु,  ‘चाणाक्ष’ पुणेकरांनी पालिका प्रशासनाला प्रतिसादामधूनच आपले मत व्यक्त केले आहे. आॅनलाईन अभिप्रायांची अपेक्षित संख्या गाठता न आल्याने पालिकेच्या कर्मचाºयांना हा अभिप्राय नोंदविण्यासाठी सक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचाºयांनी अभिप्राय नोंदविल्यानंतर त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक याचा अहवाल १९ जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सुचनाही क्षेत्रीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. या अहवालात जे कर्मचारी अभिप्राय न नोंदविलेले आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे परिपत्रकामध्ये म्हटले आहे. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजीचा सूर लावला असून अभिप्राय देणे अथवा न देणे हा वैयक्तिक मुद्दा आहे. थेट निलंबनाची धमकी देऊन प्रशासन दबावतंत्राचा वापर करीत असल्याची टीका कर्मचारी करु लागले आहेत.          स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच क्षेत्रीय कार्यालयांकडून जनजागृती करण्यात आली आहे. स्वच्छताविषयक फलक, बसथांबे, भिंतींवर लावण्यात आले आहेत. रस्त्यांवरील भिंती, पुलांच्या भिंती, कठडे रंगविण्यात आले आहेत. घनकचरा विभागाने ८० हजार चौरस फूट तर १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत ५ लाख ४० हजार चौरस फूटांची रंगरंगोटी केलेली आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका