शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक, ‘एफआरपी’बाबत कारखानदारांकडून संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 01:43 IST

केंंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आगामी २०१८-१९ या गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे.

बारामती : केंंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आगामी २०१८-१९ या गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे. साडेनऊ टक्के साखर उताºयासाठी असणारी २५५० रुपये एफआरपी आता दहा टक्के साखर उताºयासाठी २७५० रुपये करण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या एफआरपीबाबत संमिश्र प्रतिक्रिया साखर कारखानदरीच्या क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. हानिर्णय म्हणजे शेतकºयाच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पूर्वी साडेनऊ टक्के असणारा साखर उतारा आता १० टक्के करण्यात आला आहे. या साखर उताºयासाठी केवळ २७५० रुपये ‘एफआरपी’ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे साडेनऊ टक्के साखर उताºयासाठी पूर्वी मिळणारी २५५० रुपये एफआरपीचा हिशोब पाहता, प्रत्येक पॉर्इंटला २६८ रुपये मिळत होते. आज झालेल्या निर्णयानुसार अर्धा पॉर्इंट वाढविला. त्यामुळे आज एफआरपीमध्ये २०० रुपये दिसणारी वाढ फसवी आहे. खासगी साखर उत्पादकांच्या दबावाला बळी पडून केलेली ही निव्वळ धूळफेक आहे. अवघे ६६ रुपये शेतकºयाच्या हातात पडणार आहेत.माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पूर्वी १०० रुपयांपेक्षा एफआरपीमध्ये वाढ झाली नाही. मात्र, आज जाहीर झालेल्या एफआरपीनुसार साखर उताºयामध्ये अर्धा टक्का वाढ करण्यात आली असली तरी शाश्वत दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच्या सरकारने हे निर्णय घेतले नव्हते. या निर्णयाचे स्वागत आहे.घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी सांगितले, की एफआरपीसह साखरेच्या दराचे गणित केंद्र सरकारने निश्चित करावे. अभ्यास गट करून केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. एफआरपी ठरविताना साखरेच्या दराचे निर्णय ठरवावे. कारण त्यावर संस्था आणि शेतकºयांचे भवितव्य आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी