शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक, ‘एफआरपी’बाबत कारखानदारांकडून संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 01:43 IST

केंंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आगामी २०१८-१९ या गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे.

बारामती : केंंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आगामी २०१८-१९ या गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे. साडेनऊ टक्के साखर उताºयासाठी असणारी २५५० रुपये एफआरपी आता दहा टक्के साखर उताºयासाठी २७५० रुपये करण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या एफआरपीबाबत संमिश्र प्रतिक्रिया साखर कारखानदरीच्या क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. हानिर्णय म्हणजे शेतकºयाच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पूर्वी साडेनऊ टक्के असणारा साखर उतारा आता १० टक्के करण्यात आला आहे. या साखर उताºयासाठी केवळ २७५० रुपये ‘एफआरपी’ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे साडेनऊ टक्के साखर उताºयासाठी पूर्वी मिळणारी २५५० रुपये एफआरपीचा हिशोब पाहता, प्रत्येक पॉर्इंटला २६८ रुपये मिळत होते. आज झालेल्या निर्णयानुसार अर्धा पॉर्इंट वाढविला. त्यामुळे आज एफआरपीमध्ये २०० रुपये दिसणारी वाढ फसवी आहे. खासगी साखर उत्पादकांच्या दबावाला बळी पडून केलेली ही निव्वळ धूळफेक आहे. अवघे ६६ रुपये शेतकºयाच्या हातात पडणार आहेत.माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पूर्वी १०० रुपयांपेक्षा एफआरपीमध्ये वाढ झाली नाही. मात्र, आज जाहीर झालेल्या एफआरपीनुसार साखर उताºयामध्ये अर्धा टक्का वाढ करण्यात आली असली तरी शाश्वत दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच्या सरकारने हे निर्णय घेतले नव्हते. या निर्णयाचे स्वागत आहे.घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी सांगितले, की एफआरपीसह साखरेच्या दराचे गणित केंद्र सरकारने निश्चित करावे. अभ्यास गट करून केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. एफआरपी ठरविताना साखरेच्या दराचे निर्णय ठरवावे. कारण त्यावर संस्था आणि शेतकºयांचे भवितव्य आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी