शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

आरटीई प्रवेशाबाबतच्या तक्रारींची सुनावणी संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आरटीई अंतर्गत गरीब विद्याद्यार्थ्यांना शिक्षण हक्क्कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशाच्या प्रक्रियेत शेवटच्या टप्यात गोंधळाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आरटीई अंतर्गत गरीब विद्याद्यार्थ्यांना शिक्षण हक्क्कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशाच्या प्रक्रियेत शेवटच्या टप्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जवळपास ४०० पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत अपील केले असून जिल्हा परिषेेच्या शिक्षण विभागामार्फत त्याचा निकाल वेळेत लागत नसल्याची तक्रार पालक करत आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडून तक्रारदारांना नीट उत्तरे मिळत नसल्याने अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडेच तक्रारी केल्या.

गरीब विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी आरटीई अंतर्गत मोफत शाळा प्रवेश दिला जातो. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सुचना शासनाच्या आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात येते. अनेक जण चुकीची कागदपत्रे सादर करत असल्याने गरजुंना याचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारीही अनेक पालक करतात. जिल्ह्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अखरेचा टप्पा सुरू आहे. त्यात जवळपास ४०० हून अधिक पालकांनी तक्रारी अर्ज सादर केले आहे. या तक्रारींची सुनावणी शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषदेत सुरू आहे सोमवारी केवळ ८८ तक्रारींवर सुनावणी झाली. ही प्रक्रीया संथ गतीने होत असल्याने जिल्ह्यातून लाबंवरून येणाऱ्या पालकांना हेलपाटे मारावे लागत ओहत. तसेच त्यांना योग्य उत्तरे अधिकारी देत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. तक्रारी निवारनासाठी केवळ एकच अधिकारी नियुक्त केलेला असल्याने आणि त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पालकांमध्ये देखील नाराजी आहे. या तक्रारींचा निपटारा तात्काळ करावा यासाठी खास अधिकारी नियुक्त करावेत अशी मागणी पुढे आली आहे.

चौकट

अधिकारी नेमुन तक्रारींच्या सुनावण्या करा

जिल्हा परिषद सदस्य, वीरधवल जगदाळे, शरद बुट्टे पाटील, आशा बुचके यांनी आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी करावी तसेच आलेल्या तक्रारींची सुनावणी खास अधिकारी नियुक्त करून वेळेत पूर्ण करावी, अशी सूचना केली. जुन्नर तालुक्यातील रा. प. सबनीस शाळेमध्ये अनेक श्रीमंतांच्या मुलांना आरटीईअंतर्गत प्रवेश दिले आहेत. परंतु गरीब मुलांना डावलले जात असल्याबद्दल या शाळेतील प्रवेश प्रक्रिया यांची अधिकारी नेमून पडताळणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

चौकट

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात ९४३२ शाळांमध्ये १४ हजार ५५७ मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो. या वर्षी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जवळपास ६६ हजाराहून अधिक अर्ज आले होते. सर्व जागांवर विद्यार्थ्यांवर प्रवेश देण्यात आला आहे.