शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

पुणे शहरातील‘संधीसाधू’दुकानदारांची मुजोरी सुरुच;ग्राहक पंचायतीकडे 25 हून अधिक तक्रारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 06:00 IST

लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक करुन मनमानी दर आकारले जात आहे.

ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढपंचायती मार्फत सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी व जीएसटी कौन्सिल यांना देण्यात येणार

युगंधर ताजणेपुणे : अव्वाच्या सव्वा दरात वस्तुंची विक्री करणे, आपण सांगु त्याच भावात वस्तु  खरेदी करावी लागेल अन्यथा दुस-या दुकानात जावे अशा प्रकारची भाषा काही दुकानदार वापरु लागले आहेत. लॉकडाऊनच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना नाडण्याचे काम सुरु आहे. ग्राहकाला हवी असणारी वस्तु दुकानात असतानाही ती न देणे, चढया दराने त्याची विक्री करणे, बिल न देणे, संघटनेकडून दर ठरवून दिले असताना देखील अवाजवी दर आकारण्याचे प्रकार समोर आले आहेत. ग्राहक पंचायतीकडे याविषयी 25 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.  अनेक संधीसाधू व्यापारी ग्राहकांना अनेक वस्तूंच्या अवास्तव किमती लावत ग्राहकांचे प्रचंड आर्थिक शोषण करीत आहेत. शुक्रवार पेठेतील काही किराणा मालाच्या व्यापा-यांविरुद्ध पंचायतीकडे तक्रारी आलेल्या आहेत. काही जागृत ग्राहकांनी संबंधित दुकानांमध्ये वस्तूंचे दर कशा पद्धतीने आकारले जात आहेत हे सर्वांच्या लक्षात यावे यासाठी काही दुकानांच्या (कच्चा) बिलांचे फोटोही ग्राहक पंचायतीकडे पाठवले आहेत.ते फोटो पाहून ग्राहकांची तक्रार रास्त आहे असे जाणवल्यामुळे पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड वस्तूंच्या(होलसेल)किमती विषयी चौकशी केली.  याविषयी अधिक माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सह कोषाध्यक्ष विलास लेले म्हणाले,  लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक सुरुच आहे. फसवणूक करणा-या दुकानदारांविषयी किराणा माल संघटनेच्या पदाधिका-यांना विचारणा केली आहे. तसेच पोलीस आणि अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांना देखील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. दुकानदारांनी अशीच फसवणूक सुरु ठेवल्यास त्यांच्याबद्द्लची माहिती सोशल माध्यमांवर नाईलाजास्तव व्हायरल करण्यात येईल.  ग्राहकांची फसवणूक करुन मनमानी दर आकारले जात आहे.  त्यांना जीएसटी चे पक्के बिलही दिले जात नाही तसेच सरकारचा टॅक्स ही चुकवला जात आहे.  यावर योग्य उपाय व्हावा म्हणूनच पंचायती मार्फत सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी व जीएसटी कौन्सिल यांना देण्यात येणार आहे. ग्राहकांना पक्के बिल द्यावे व ग्राहकांचे आर्थिक शोषण होणार नाही इतका नफा कमवावा. अशी विनंती व्यापारी वर्गाला पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.  

* अशीही ही बनवाबनवी ... -  उत्तम दर्जाची हळकुंड ११० ते १२० रु.किलो या दराने उपलब्ध असताना ती ग्राहकाला २४० रु.किलो या दराने विकण्यात येत आहे. -  एका कंपनीचा हिंग २०० ग्रॅमचा १ डबा  होलसेल भाव १०० रुपये असा आहे. त्यावर एमआरपी २१५ रुपये आहे. ग्राहकाला हा हिंग १५० रुपयात मिळत आहे.-  मार्केटयार्ड मध्ये उत्तम दर्जाच्या छोलेचा (काबुलीचना) कट्ट्याचा भाव ८० ते ९० रुपयांच्या आसपास आहे.त्याचा भाव ग्राहकास १६० रुपये लावण्यात आलेला आहे. - चांगल्या प्रतीचा रवा चौदाशे ते पंधराशे रुपये ५० किलोच्या पोत्याचा भाव आहे.( म्हणजे वाहतूक, वजन घाटी, प्लॅस्टिक पिशव्या इत्यादी सर्व खर्च धरून ३२ ते ३३ रुपये प्रती किलो)तो ४४ रुपये किलो या दराने ग्राहकाला विकण्यात आलेला आहे. - कॉर्नफ्लॉवरचे ५० किलोचे पोते दोन हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. म्हणजेच साधारण ४०/५०रुपये किलोची वस्तू ग्राहकास १२० रुपये किलो या दराने विकण्यात आलेली आहे. बिलात दहा रुपये जास्तीचे वसूल केले जात असल्याचे ग्राहक पंचायतीनेच तक्रारदार ग्राहकांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे.

टॅग्स :Puneपुणेfraudधोकेबाजी