शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुणे शहरातील‘संधीसाधू’दुकानदारांची मुजोरी सुरुच;ग्राहक पंचायतीकडे 25 हून अधिक तक्रारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 06:00 IST

लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक करुन मनमानी दर आकारले जात आहे.

ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढपंचायती मार्फत सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी व जीएसटी कौन्सिल यांना देण्यात येणार

युगंधर ताजणेपुणे : अव्वाच्या सव्वा दरात वस्तुंची विक्री करणे, आपण सांगु त्याच भावात वस्तु  खरेदी करावी लागेल अन्यथा दुस-या दुकानात जावे अशा प्रकारची भाषा काही दुकानदार वापरु लागले आहेत. लॉकडाऊनच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना नाडण्याचे काम सुरु आहे. ग्राहकाला हवी असणारी वस्तु दुकानात असतानाही ती न देणे, चढया दराने त्याची विक्री करणे, बिल न देणे, संघटनेकडून दर ठरवून दिले असताना देखील अवाजवी दर आकारण्याचे प्रकार समोर आले आहेत. ग्राहक पंचायतीकडे याविषयी 25 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.  अनेक संधीसाधू व्यापारी ग्राहकांना अनेक वस्तूंच्या अवास्तव किमती लावत ग्राहकांचे प्रचंड आर्थिक शोषण करीत आहेत. शुक्रवार पेठेतील काही किराणा मालाच्या व्यापा-यांविरुद्ध पंचायतीकडे तक्रारी आलेल्या आहेत. काही जागृत ग्राहकांनी संबंधित दुकानांमध्ये वस्तूंचे दर कशा पद्धतीने आकारले जात आहेत हे सर्वांच्या लक्षात यावे यासाठी काही दुकानांच्या (कच्चा) बिलांचे फोटोही ग्राहक पंचायतीकडे पाठवले आहेत.ते फोटो पाहून ग्राहकांची तक्रार रास्त आहे असे जाणवल्यामुळे पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड वस्तूंच्या(होलसेल)किमती विषयी चौकशी केली.  याविषयी अधिक माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सह कोषाध्यक्ष विलास लेले म्हणाले,  लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक सुरुच आहे. फसवणूक करणा-या दुकानदारांविषयी किराणा माल संघटनेच्या पदाधिका-यांना विचारणा केली आहे. तसेच पोलीस आणि अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांना देखील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. दुकानदारांनी अशीच फसवणूक सुरु ठेवल्यास त्यांच्याबद्द्लची माहिती सोशल माध्यमांवर नाईलाजास्तव व्हायरल करण्यात येईल.  ग्राहकांची फसवणूक करुन मनमानी दर आकारले जात आहे.  त्यांना जीएसटी चे पक्के बिलही दिले जात नाही तसेच सरकारचा टॅक्स ही चुकवला जात आहे.  यावर योग्य उपाय व्हावा म्हणूनच पंचायती मार्फत सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी व जीएसटी कौन्सिल यांना देण्यात येणार आहे. ग्राहकांना पक्के बिल द्यावे व ग्राहकांचे आर्थिक शोषण होणार नाही इतका नफा कमवावा. अशी विनंती व्यापारी वर्गाला पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.  

* अशीही ही बनवाबनवी ... -  उत्तम दर्जाची हळकुंड ११० ते १२० रु.किलो या दराने उपलब्ध असताना ती ग्राहकाला २४० रु.किलो या दराने विकण्यात येत आहे. -  एका कंपनीचा हिंग २०० ग्रॅमचा १ डबा  होलसेल भाव १०० रुपये असा आहे. त्यावर एमआरपी २१५ रुपये आहे. ग्राहकाला हा हिंग १५० रुपयात मिळत आहे.-  मार्केटयार्ड मध्ये उत्तम दर्जाच्या छोलेचा (काबुलीचना) कट्ट्याचा भाव ८० ते ९० रुपयांच्या आसपास आहे.त्याचा भाव ग्राहकास १६० रुपये लावण्यात आलेला आहे. - चांगल्या प्रतीचा रवा चौदाशे ते पंधराशे रुपये ५० किलोच्या पोत्याचा भाव आहे.( म्हणजे वाहतूक, वजन घाटी, प्लॅस्टिक पिशव्या इत्यादी सर्व खर्च धरून ३२ ते ३३ रुपये प्रती किलो)तो ४४ रुपये किलो या दराने ग्राहकाला विकण्यात आलेला आहे. - कॉर्नफ्लॉवरचे ५० किलोचे पोते दोन हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. म्हणजेच साधारण ४०/५०रुपये किलोची वस्तू ग्राहकास १२० रुपये किलो या दराने विकण्यात आलेली आहे. बिलात दहा रुपये जास्तीचे वसूल केले जात असल्याचे ग्राहक पंचायतीनेच तक्रारदार ग्राहकांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे.

टॅग्स :Puneपुणेfraudधोकेबाजी