शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पुणे शहरातील‘संधीसाधू’दुकानदारांची मुजोरी सुरुच;ग्राहक पंचायतीकडे 25 हून अधिक तक्रारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 06:00 IST

लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक करुन मनमानी दर आकारले जात आहे.

ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढपंचायती मार्फत सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी व जीएसटी कौन्सिल यांना देण्यात येणार

युगंधर ताजणेपुणे : अव्वाच्या सव्वा दरात वस्तुंची विक्री करणे, आपण सांगु त्याच भावात वस्तु  खरेदी करावी लागेल अन्यथा दुस-या दुकानात जावे अशा प्रकारची भाषा काही दुकानदार वापरु लागले आहेत. लॉकडाऊनच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना नाडण्याचे काम सुरु आहे. ग्राहकाला हवी असणारी वस्तु दुकानात असतानाही ती न देणे, चढया दराने त्याची विक्री करणे, बिल न देणे, संघटनेकडून दर ठरवून दिले असताना देखील अवाजवी दर आकारण्याचे प्रकार समोर आले आहेत. ग्राहक पंचायतीकडे याविषयी 25 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.  अनेक संधीसाधू व्यापारी ग्राहकांना अनेक वस्तूंच्या अवास्तव किमती लावत ग्राहकांचे प्रचंड आर्थिक शोषण करीत आहेत. शुक्रवार पेठेतील काही किराणा मालाच्या व्यापा-यांविरुद्ध पंचायतीकडे तक्रारी आलेल्या आहेत. काही जागृत ग्राहकांनी संबंधित दुकानांमध्ये वस्तूंचे दर कशा पद्धतीने आकारले जात आहेत हे सर्वांच्या लक्षात यावे यासाठी काही दुकानांच्या (कच्चा) बिलांचे फोटोही ग्राहक पंचायतीकडे पाठवले आहेत.ते फोटो पाहून ग्राहकांची तक्रार रास्त आहे असे जाणवल्यामुळे पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड वस्तूंच्या(होलसेल)किमती विषयी चौकशी केली.  याविषयी अधिक माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सह कोषाध्यक्ष विलास लेले म्हणाले,  लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक सुरुच आहे. फसवणूक करणा-या दुकानदारांविषयी किराणा माल संघटनेच्या पदाधिका-यांना विचारणा केली आहे. तसेच पोलीस आणि अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांना देखील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. दुकानदारांनी अशीच फसवणूक सुरु ठेवल्यास त्यांच्याबद्द्लची माहिती सोशल माध्यमांवर नाईलाजास्तव व्हायरल करण्यात येईल.  ग्राहकांची फसवणूक करुन मनमानी दर आकारले जात आहे.  त्यांना जीएसटी चे पक्के बिलही दिले जात नाही तसेच सरकारचा टॅक्स ही चुकवला जात आहे.  यावर योग्य उपाय व्हावा म्हणूनच पंचायती मार्फत सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी व जीएसटी कौन्सिल यांना देण्यात येणार आहे. ग्राहकांना पक्के बिल द्यावे व ग्राहकांचे आर्थिक शोषण होणार नाही इतका नफा कमवावा. अशी विनंती व्यापारी वर्गाला पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.  

* अशीही ही बनवाबनवी ... -  उत्तम दर्जाची हळकुंड ११० ते १२० रु.किलो या दराने उपलब्ध असताना ती ग्राहकाला २४० रु.किलो या दराने विकण्यात येत आहे. -  एका कंपनीचा हिंग २०० ग्रॅमचा १ डबा  होलसेल भाव १०० रुपये असा आहे. त्यावर एमआरपी २१५ रुपये आहे. ग्राहकाला हा हिंग १५० रुपयात मिळत आहे.-  मार्केटयार्ड मध्ये उत्तम दर्जाच्या छोलेचा (काबुलीचना) कट्ट्याचा भाव ८० ते ९० रुपयांच्या आसपास आहे.त्याचा भाव ग्राहकास १६० रुपये लावण्यात आलेला आहे. - चांगल्या प्रतीचा रवा चौदाशे ते पंधराशे रुपये ५० किलोच्या पोत्याचा भाव आहे.( म्हणजे वाहतूक, वजन घाटी, प्लॅस्टिक पिशव्या इत्यादी सर्व खर्च धरून ३२ ते ३३ रुपये प्रती किलो)तो ४४ रुपये किलो या दराने ग्राहकाला विकण्यात आलेला आहे. - कॉर्नफ्लॉवरचे ५० किलोचे पोते दोन हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. म्हणजेच साधारण ४०/५०रुपये किलोची वस्तू ग्राहकास १२० रुपये किलो या दराने विकण्यात आलेली आहे. बिलात दहा रुपये जास्तीचे वसूल केले जात असल्याचे ग्राहक पंचायतीनेच तक्रारदार ग्राहकांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे.

टॅग्स :Puneपुणेfraudधोकेबाजी