शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

पुणे शहरातील आरक्षण बदलाबाबत आमदार गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 16:43 IST

सामाजिक व शहराचे हित लक्षात घेऊनच आरक्षण बदलाबाबत निर्णय घ्यावा : निलम गोऱ्हे

ठळक मुद्देकधी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे तर कधी रस्त्याच्या आखणीचे कारणे देत ही प्रक्रिया सुरूमंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात बदल करणे व तेही आरक्षणात हे अत्यंत अयोग्य

पुणे : शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील कोथरूड, बाणेर, मुंढवा येथील आरक्षणे बदलली जात असल्याबद्दल आमदार निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली आहे. कोथरूड, बाणेर, मुंढवा ही शहराची उपनगरे आहेत. कोथरूड हे तर आता शहराचे केंद्रस्थान होत चालले आहे. तिथे  शाळा, मैदाने, दवाखाने, उद्याने यांची आत्यंतिक गरज आहे. हे लक्षात घेऊनच उद्यान, अग्निशमन केंद्र, प्राथमिक शाळा यासाठी आरक्षणे ठेवण्यात आली होती. आता काही ना काही कारणे दाखवून ही आरक्षणे रद्द करण्याचा प्रयत्न होत असल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले आहे. विधानसभेच्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, तसेच या तिन्ही क्षेत्रातील आरक्षणे उठवण्याबाबत प्रक्रिया सुरू केली गेली असल्याचेही दिसते आहे. कधी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे तर कधी रस्त्याच्या आखणीचे अशी कारणे देत ही प्रक्रिया सुरू केली आहे. हरकती सूचना यांची सुनावणी घेऊन मंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात बदल करणे व तेही आरक्षणात हे अत्यंत अयोग्य असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.सामाजिक हिताबरोबरच शहराचे हित सुध्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी अन्य जागा मिळू शकते. राज्य सरकार त्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकते. रस्त्याची आखणी करणेही सरकारच्याच अखत्यारीतील गोष्ट आहे. त्यांना विरोध नाही, मात्र त्यासाठी आरक्षणात बदल करणे चुकीचे आहे. त्यामुळे सामाजिक व शहराचे हित लक्षात घेऊनच आरक्षण बदलाबाबत निर्णय घ्यावा, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिनGovernmentसरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका