शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

पुणे शहरातील आरक्षण बदलाबाबत आमदार गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 16:43 IST

सामाजिक व शहराचे हित लक्षात घेऊनच आरक्षण बदलाबाबत निर्णय घ्यावा : निलम गोऱ्हे

ठळक मुद्देकधी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे तर कधी रस्त्याच्या आखणीचे कारणे देत ही प्रक्रिया सुरूमंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात बदल करणे व तेही आरक्षणात हे अत्यंत अयोग्य

पुणे : शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील कोथरूड, बाणेर, मुंढवा येथील आरक्षणे बदलली जात असल्याबद्दल आमदार निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली आहे. कोथरूड, बाणेर, मुंढवा ही शहराची उपनगरे आहेत. कोथरूड हे तर आता शहराचे केंद्रस्थान होत चालले आहे. तिथे  शाळा, मैदाने, दवाखाने, उद्याने यांची आत्यंतिक गरज आहे. हे लक्षात घेऊनच उद्यान, अग्निशमन केंद्र, प्राथमिक शाळा यासाठी आरक्षणे ठेवण्यात आली होती. आता काही ना काही कारणे दाखवून ही आरक्षणे रद्द करण्याचा प्रयत्न होत असल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले आहे. विधानसभेच्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, तसेच या तिन्ही क्षेत्रातील आरक्षणे उठवण्याबाबत प्रक्रिया सुरू केली गेली असल्याचेही दिसते आहे. कधी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे तर कधी रस्त्याच्या आखणीचे अशी कारणे देत ही प्रक्रिया सुरू केली आहे. हरकती सूचना यांची सुनावणी घेऊन मंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात बदल करणे व तेही आरक्षणात हे अत्यंत अयोग्य असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.सामाजिक हिताबरोबरच शहराचे हित सुध्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी अन्य जागा मिळू शकते. राज्य सरकार त्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकते. रस्त्याची आखणी करणेही सरकारच्याच अखत्यारीतील गोष्ट आहे. त्यांना विरोध नाही, मात्र त्यासाठी आरक्षणात बदल करणे चुकीचे आहे. त्यामुळे सामाजिक व शहराचे हित लक्षात घेऊनच आरक्षण बदलाबाबत निर्णय घ्यावा, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिनGovernmentसरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका