शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

‘आधार’साठी शुल्काची मागणी? करा नोडल अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 18:24 IST

काही आधार केंद्रांवर नोंदणी आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. नागरिकांना आता आधार समन्वयक अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याबरोबरच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

ठळक मुद्देगेल्या दोन महिन्यांत ३३ आधार यंत्रचालकांना टाकण्यात आले काळ्या यादीतजादा शुल्क आकारल्यास संबंधित सेवा केंद्र सील करून दाखल करण्यात येणार गुन्हे

कोरेगाव मूळ : गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील आधार केंद्र ठप्प झाली आहेत. त्याचा गैरफायदा घेत काही आधार केंद्रांवर सामान्य नागरिकांकडून आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. अशा प्रकारच्या विरोधात नागरिकांना आता आधार समन्वयक अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याबरोबरच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.केंद्र शासनाच्या आदेशानुसार बँकखाते, शाळा व महाविद्यालयात, प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी, मोबाइलच्या सीमकार्डला जोडणी करण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. जिल्ह्यात आधार केंद्रांवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेत गेल्या दोन महिन्यांत ३३ आधार यंत्रचालकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांकडून आधारची कामे करताना अतिरिक्त शुल्क आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.नव्याने आधार नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तर, दुरुस्तीकरिता शासनाच्या नियमानुसार २५ रुपये शुल्क आकारले जाते. या व्यतिरिक्त नागरिकांकडून जादा शुल्क आकारल्यास आधार नोडल अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी. या ठिकाणी तक्रार केल्यानंतर निवारण न झाल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केवळ तक्रार स्वीकारण्याचे अधिकार आहेत. परंतु, आलेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठवून तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे.केंद्र चालकांना निलंबनाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. आधारच्या दुरुस्तीसाठी नियमाप्रमाणे असलेल्या शुल्कापेक्षा जादा शुल्क आकारल्यास संबंधित सेवा केंद्र सील करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. आधार कार्डबाबत काढण्यात आलेल्या निविदा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी रद्द केल्या असून, प्रत्येक तालुक्यात एकच सरकारी केंद्र ठेवले आहे. तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे थेट अधिकार दिले असून तक्रारी आल्यास संबंधित सेवा केंद्रांवर ते कारवाई करू शकतात, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया- यूआयडीएआय) तक्रार निवारणासाठी १९४७ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPuneपुणे