शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक - कडक निर्बंधांमुळे पॉझिटिव्हीटी रेट झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:11 IST

पुणे : राज्य शासन आणि महापालिकेकडून कडक निर्बंध लावून १५ दिवस उलटून गेले आहेत. या काळात आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी ...

पुणे : राज्य शासन आणि महापालिकेकडून कडक निर्बंध लावून १५ दिवस उलटून गेले आहेत. या काळात आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी होत असून पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला आहे. निर्बंधांचा परिणाम काही प्रमाणात दिसत असला, तरी त्याचा वेग मात्र कमी आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत या निर्बंधांचे ''रिझल्ट'' दिसतील, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रुग्णवाढ या निर्बंधांचा खरोखरीच उपयोग होतो का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण, नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. रस्त्यावर एवढ्या कडक निर्बंधांमध्येही गर्दी होत आहे. वाहनचालक रस्त्यावर राजरोसपणे फिरत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पोलिसांकडूनही नागरिकांना फारसे टोकले जात नाही. पहिल्या लाटेत पोलिसांनी कडक करवाईववर भर दिला होता. मात्र, यावेळी पोलिसांकडून ढिल दिली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

दररोजची रुग्णसंख्या कमी होत नसल्याने संचारबंदीचा खरोखरीच उपयोग झालाय का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. प्रशासनाकडून मात्र पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून रुग्णांचा आकडा स्थिर असून आणखी काही दिवस हा आकडा स्थिर राहिल्यास तो कमी होत जाईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

-----

कडक निर्बंधांचा परिणाम दिसू लागला आहे. दोन आठवड्यांपूर्वी आरटी-पीसीआर चाचणीला येणाऱ्यांमधून ५०-५५ टक्के नागरिक पॉझिटिव्ह येत होते. परंतु, या आठवड्यात पॉझिटिव्हीटीचे हे प्रमाण ३०-३५ टक्क्यांवर आले आहे. पूर्ण लॉकडाऊन हा पर्याय नसला तरी कडक निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. ३० एप्रिलपर्यंत वेळ द्यायला हवा. यासोबतच तिसऱ्या लाटेची शासन-प्रशासनाकडून तयारी केली जाणे आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेआधी मिळालेल्या अवधीमध्ये वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे आवश्यक होते.

- डॉ. संजय ललवाणी, भारती हॉस्पिटल

-----

संचाराबंदी असली तरी या निर्बंधांचे लोकांकडून पालन होत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. लोकांनी नियमांचे पालन केले तर रुग्णसंख्या आणखी कमी होऊ शकते. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ देणेही आवश्यक आहे. त्याशिवाय या निर्बंधांचे योग्य परिणाम दिसणार नाहीत.

- डॉ. बाळासाहेब देशमुख, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे

-----

कडक निर्बंध लावल्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या काही दिवसात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. रुग्णसंख्या सुद्धा मागील तीन चार दिवसांपासून स्थिर आहे. अशीच स्थिती राहिली तर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाहीत. पुण्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

-----